शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कुतूहल जागृत ठेवण्याची जबाबदारी लेखकांची

By admin | Updated: June 1, 2016 00:57 IST

‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात

पुणे : ‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. त्यामुळे विज्ञान लेखकांवर विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. कुतूहल जागृत ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्याची गोडी लागेल,’ असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे डॉ. के. सी. मोहिते लिखित ‘सेरेन्डीपीटी’ अर्थात अनपेक्षित लागलेले शोध आणि वैशाली मोहिते लिखित ‘ती’च्या कविता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी झाला. त्याप्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर बोलत होते. कार्यक्रमास चिंतन ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त व संशोधन विभागप्रमुख डॉ. मंदा खांडगे, स्नेहवर्धन प्रकाशन संस्थेच्या डॉ. स्नेहल तावरे आदी उपस्थित होते. पंडित विद्यासागर म्हणाले, ‘‘इंग्रजी शाळांची संख्या वाढली असली तरी मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले विज्ञानविषयक लेखन वाचणाऱ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी विज्ञानातील संकल्पना मातृभाषेतून समजावून घेणे पसंत करतात. त्यामुळे विज्ञानलेखकांवर या विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. लेखकांनी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर लिहिले पाहिजेत. विज्ञानामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि अचूकता असते. त्यात कल्पनारंजन आणता येत नाही. विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवणे अवघड आहे. मात्र, सतत काहीतरी लिहून ते जागे ठेवायला हवे.’’खांडगे यांनी के. सी. मोहिते व वैशाली मोहिते यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिनंदन थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी माहिती देऊन वैशाली मोहिते व डॉ. के. सी. मोहिते यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली. तर डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘लोकमत’च्या युरेका पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित सेरेन्डीपीटी या पुस्तकाविषयी माहिती दिली. वैशाली मोहिते यांनी याप्रसंगी आपल्या काही कवितांचे वाचन केले. तसेच काव्यलेखनाची पार्श्वभूमी सांगितली.