शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

आॅटोरिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करा

By admin | Updated: July 28, 2015 00:44 IST

सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही.

पुणे : सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी १५ आॅगस्टपूर्वी प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २८ मे रोजी झालेल्या बैठकीत रिक्षांच्या भाडेदरवाढीस मान्यता दिली आहे. नवीन भाडेदर १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी दि. १५ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रमाणीकरण हे वैधमापन विभागाकडून करण्यात येत आहे. २२ जुलैपर्यंत सुमारे ४५ हजार रिक्षांपैकी १६ हजार ८८३ रिक्षांचे प्रमाणीकरण झालेले आहे. इतर रिक्षांचे प्रमाणीकरण १५ आॅगस्टपर्यंत करणे बंधनकारक आहे, असे पाटील यांनी सांगितले.आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत रिक्षांची तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत व तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळावी, असेही आवाहन पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)