शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: November 30, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत

पुणे : जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी ३0 नोव्हेंबरला होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.२६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने चासकमान, भामा आसखेड, मुळशी, आंद्रा या धरणांतून १0 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. धरणांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याबरोबरच, ‘रास्तो रोका’ आंदोलनेही झाली. प्राधिकरणाकडे पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. यावर प्राधिकरणाने आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने वरील निर्णयाला स्थगिती न देता, ३0 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, दोन दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या असल्याने पाणी सोडले गेले नाही; तसेच न्यायालयाचा निर्णयही बाकी होता. आता उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर न्यायालयाने पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर मात्र प्रशासनाला तत्काळ पाणी सोडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.(प्रतिनिधी)मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३0 दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठी चारापिके आहेत.ऊस वगळता, ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहे. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी कसे पुरणार, असा सवाल मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे यांनी केला. आमच्या तोंडचे काढून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग, मुळशी धरणावरील वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी का पळवताय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.