शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: November 30, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत

पुणे : जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी ३0 नोव्हेंबरला होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.२६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने चासकमान, भामा आसखेड, मुळशी, आंद्रा या धरणांतून १0 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. धरणांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याबरोबरच, ‘रास्तो रोका’ आंदोलनेही झाली. प्राधिकरणाकडे पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. यावर प्राधिकरणाने आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने वरील निर्णयाला स्थगिती न देता, ३0 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, दोन दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या असल्याने पाणी सोडले गेले नाही; तसेच न्यायालयाचा निर्णयही बाकी होता. आता उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर न्यायालयाने पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर मात्र प्रशासनाला तत्काळ पाणी सोडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.(प्रतिनिधी)मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३0 दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठी चारापिके आहेत.ऊस वगळता, ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहे. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी कसे पुरणार, असा सवाल मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे यांनी केला. आमच्या तोंडचे काढून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग, मुळशी धरणावरील वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी का पळवताय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.