शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: November 30, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत

पुणे : जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी ३0 नोव्हेंबरला होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.२६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने चासकमान, भामा आसखेड, मुळशी, आंद्रा या धरणांतून १0 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. धरणांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याबरोबरच, ‘रास्तो रोका’ आंदोलनेही झाली. प्राधिकरणाकडे पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. यावर प्राधिकरणाने आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने वरील निर्णयाला स्थगिती न देता, ३0 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, दोन दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या असल्याने पाणी सोडले गेले नाही; तसेच न्यायालयाचा निर्णयही बाकी होता. आता उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर न्यायालयाने पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर मात्र प्रशासनाला तत्काळ पाणी सोडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.(प्रतिनिधी)मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३0 दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठी चारापिके आहेत.ऊस वगळता, ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहे. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी कसे पुरणार, असा सवाल मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे यांनी केला. आमच्या तोंडचे काढून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग, मुळशी धरणावरील वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी का पळवताय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.