शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: January 1, 2015 01:01 IST

येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे.

पुणे : येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे. नागरिकांना पोलिसांच्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्या पोलीस दलाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले. यासोबतच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती माथूर यांनी दिली.गेल्या ७ महिन्यांमध्ये शहर पोलिसांनी तब्बल २२५ विविध कार्यक्रम घेतले आहेत. पोलीस दलाचा चेहरा अधिक समाजाभिमुख करण्याचा त्यातून प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. येत्या वर्षामध्ये शहर पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. अधिकाधिक लोकसंवादामधून समोर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचा सहभागदेखील आवश्यक असल्याचे माथूर म्हणाले. सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ दिसत असली, तरीदेखील गुन्हे उघडकीस आणण्यामध्येही पुणे शहर पोलिसांचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज सार्वजनिक कार्यक्रम घेऊन फिर्यादींना परत देण्यात आला. असा उपक्रम राज्यात कुठेही राबविण्यात आलेला नसल्याचे उपायुक्त (गुन्हे) जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.लोकसंख्यावाढीचा परिणाम गुन्हेगारीवरहीच्शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे, त्या प्रमाणात गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत जाणार. जे गुन्हे घडतात ते दाखल करून घेतले जातात. गुन्हे दाखल करून घेतले जात असल्यामुळे संख्या जास्त वाटते. परंतु, गुन्हेच दाखल न करता जर ‘क्राईम रेट’ खाली आणायचा असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवालही आयुक्तांनी केला.च्अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील काही गावे शहराला जोडली गेली आहेत. या गावांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ मात्र पोलिसांना मिळालेले नाही. जर लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले नाहीत, तर ‘व्यवस्थे’मध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले याचा अर्थ गुन्हेगारी वाढली अगर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले म्हणजे गुन्हेगारी कमी झाली, असा होत नाही, असेही ते म्हणाले.च्शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण जाणवत आहे. वाहतूककोंडी आणि वाहतुकीच्या समस्या सोडवायच्या असल्यास केवळ पोलिसांवर विसंबून राून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांच्या सहभागाचीही आवश्यक आहे. च्येत्या काळात सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सबळ साक्षीपुरावे सादर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले.