शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: January 1, 2015 01:01 IST

येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे.

पुणे : येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे. नागरिकांना पोलिसांच्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्या पोलीस दलाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले. यासोबतच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती माथूर यांनी दिली.गेल्या ७ महिन्यांमध्ये शहर पोलिसांनी तब्बल २२५ विविध कार्यक्रम घेतले आहेत. पोलीस दलाचा चेहरा अधिक समाजाभिमुख करण्याचा त्यातून प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. येत्या वर्षामध्ये शहर पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. अधिकाधिक लोकसंवादामधून समोर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचा सहभागदेखील आवश्यक असल्याचे माथूर म्हणाले. सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ दिसत असली, तरीदेखील गुन्हे उघडकीस आणण्यामध्येही पुणे शहर पोलिसांचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज सार्वजनिक कार्यक्रम घेऊन फिर्यादींना परत देण्यात आला. असा उपक्रम राज्यात कुठेही राबविण्यात आलेला नसल्याचे उपायुक्त (गुन्हे) जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.लोकसंख्यावाढीचा परिणाम गुन्हेगारीवरहीच्शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे, त्या प्रमाणात गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत जाणार. जे गुन्हे घडतात ते दाखल करून घेतले जातात. गुन्हे दाखल करून घेतले जात असल्यामुळे संख्या जास्त वाटते. परंतु, गुन्हेच दाखल न करता जर ‘क्राईम रेट’ खाली आणायचा असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवालही आयुक्तांनी केला.च्अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील काही गावे शहराला जोडली गेली आहेत. या गावांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ मात्र पोलिसांना मिळालेले नाही. जर लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले नाहीत, तर ‘व्यवस्थे’मध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले याचा अर्थ गुन्हेगारी वाढली अगर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले म्हणजे गुन्हेगारी कमी झाली, असा होत नाही, असेही ते म्हणाले.च्शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण जाणवत आहे. वाहतूककोंडी आणि वाहतुकीच्या समस्या सोडवायच्या असल्यास केवळ पोलिसांवर विसंबून राून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांच्या सहभागाचीही आवश्यक आहे. च्येत्या काळात सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सबळ साक्षीपुरावे सादर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले.