शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:24 IST

बारामती नगरपालिका वाढीव हद्दीतील २० टक्के करवाढीला आम्ही सहमत नाही. वाढीव हद्दीतील केलेली करवाढ नगरविकास खात्याच्या कर मूल्य निर्धारण समितीने सुचविली आहे.

बारामती : बारामती नगरपालिका वाढीव हद्दीतील २० टक्के करवाढीला आम्ही सहमत नाही. वाढीव हद्दीतील केलेली करवाढ नगरविकास खात्याच्या कर मूल्य निर्धारण समितीने सुचविली आहे. मात्र विरोधक बारामतीच्या विकासात जाणीवपूर्वक खीळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.करवाढीसंदर्भात शुक्रवारी (दि. २९) झालेल्या सुनावणीवेळी अधिकारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही वेळ सुनावणी बंद झाली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने पत्रकारांशी बोलताना विरोधकांच्या भूमिकेवर आक्षेप घेत भूमिका स्पष्ट केली. या वेळी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह राष्टÑवादीचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक संजय संघवी आदी नगरसेवक उपस्थित होते.या वेळी नगराध्यक्षा तावरे म्हणाल्या, की राष्टÑवादीची भूमिका ही लोकाभिमुख निर्णय घेण्याची आहे. विरोधक केवळ अडवणूक करीत आहेत. वाढीव करआकारणीची सूचना आम्ही केलेली नाही. तो अधिकार सभागृहाला नाही. मात्र, विरोधक प्रत्येक ठिकाणी विरोध करतात. नगरपालिका प्रशासन चालविणे महत्त्वाचे आहे. विरोधकांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कामकाज बाजूला राहते. निरर्थक कामांमध्ये वेळ जातो, असे नगराध्यक्षा तावरे म्हणाल्या.ज्येष्ठ नगरसेवक गुजर म्हणाले, की नगररचना विभागाची करमूल्य निर्धारण समितीने ती करवाढ सुचविलेली आहे. ही करवाढ आम्ही सुचविलेली नाही. आतापर्यंत नगरपालिका हद्दीतील ज्या करआकारण्या झाल्या, त्या शासनाच्या नियमानुसारचझाल्या आहेत. वाढीव करआकारणीबात आज नियमानुसार नगररचना विभागाचे अधिकारी सुनावणीसाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी होती. दबावाचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याची विरोधकांची भूमिका अयोग्य आहे, हीच भूमिका राहिल्यास येणारा अर्थसंकल्प होऊ शकणार नाही, अशी भीती गुजर यांनी व्यक्त केली.>उपनगराध्यक्ष जय पाटील म्हणाले, की विरोधकांना करवाढीबाबत मुख्यमंत्र्यांकडे जाणे शक्य होते. मात्र ते गेले नाहीत. ज्याचा दोष आमचा नाही, त्याचे खापर आमच्यावर फोडणे कितपत योग्य आहे. वाढीव करवाढीतील त्रुटींबाबत सुनावणी होऊन मिळकतधारकांना दिलासा मिळतो. त्यासाठी सुनावणीवेळी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असते, मात्र जाणीवपूर्वक विरोधक अधिकाºयांची अडवणूक करीत असल्याचे पाटील म्हणाले.