शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

साडेतीन हजार कचरावेचकांच्या संस्थेला वाळीत टाकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

पुणे : मोठ्या खाजगी ठेकेदारांना कचरा उचलण्याचे काम देण्यासाठी पालिकेतील पदाधिकऱ्यांची धडपड सुरू आहे. साडेतीन हजार कचरा वेचकांच्या संस्थेला ...

पुणे : मोठ्या खाजगी ठेकेदारांना कचरा उचलण्याचे काम देण्यासाठी पालिकेतील पदाधिकऱ्यांची धडपड सुरू आहे. साडेतीन हजार कचरा वेचकांच्या संस्थेला सामाजिकदृष्ट्या ‘वाळीत’ टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कचरावेचकांकडून या संभाव्य कंत्राटीकरणाचा निषेध केला असून, आमचा हक्क हिरावून घ्याल तर तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा कचरावेचकांनी दिला.

स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पुण्यातील सर्वपक्षीय ११४ नगरसेवकांनी व ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतधारकांनी (३३ लाख नागरिक) कामाबद्दल समाधान व्यक्त करीत ‘स्वच्छ’ची सेवा सुरू ठेवण्याविषयी पत्र दिले होते. ही लाखो पत्रे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आली होती. महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका घेत कचरावेचकांच्या कामाचे कंत्राटीकरण न करता स्वच्छचे काम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, स्थायी समितीने पुन्हा या कामाचे कंत्राटीकरण करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आधीच कठीण काळाचा सामना करत असलेल्या कचरावेचकांना जगण्याचे प्रश्न सतावत आहेत.

/---/

व्यवस्था सुधारण्याबद्दल चर्चा करून कचरावेचकांच्या अडचणी दूर करून पुढची वाटचाल एकत्र निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले होते. कुठलीच चर्चा न करता, आमच्या कामाचे कंत्राटीकरण करण्याचे निर्णय घेऊन एक-एक महिन्यासाठी आम्हाला मुदत वाढ देऊन आमची फसवणूक केल्यासारखे दिसत आहे.

- शोभा बनसोडे, कचरावेचक

-----

ठेकेदार कामगारांना कसे वागवतात आणि पिळवणूक करतात हे आम्ही रोज बघतो. आमची स्वतःची संस्था नसेल तर आम्हाला शोषणापासून कोण वाचवणार? गेल्या एका वर्षात आम्हाला पालिकेकडून सुरक्षा साहित्य, भत्ता, विमा, काहीच गरजेनुसार मिळाले नाही. आम्ही आमच्या संस्थेमार्फत ह्या सर्व गोष्टी मिळवल्या आहेत.

– विद्या नाईकनवरे

----

1. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील कोविड भत्ता मुख्य सभेपुढे अजूनही प्रलंबित आहे.

2. आतापर्यंत पाच कचरावेचकांचे निधन झाले असून पालिका त्यांना विमा लागू नसल्याचे सांगत आहे.

3. कचरावेचकांना साबण, मास्क, ग्लोव्ह, सॅनिटाईजर असे फक्त ३० टक्के साहित्य पालिकेकडून मिळाले आहे.

------

स्वच्छची स्थापना पालिकेच्या मुख्य सभेच्या ठरावामार्फत २००७ मध्ये झाली. साधारण ३ हजार ५०० कचरावेचक रोज १ हजार ४०० टन कचरा उचलतात. तर, २०० टन कचरा रिसायकलिंगसाठी पाठविला जातो. या मॉडेलमुळे पालिकेची १०० कोटी रुपयांची वार्षिक बचत होते आहे.