शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

‘टाटां’च्या धरणातून पुण्याला पाणी मिळवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

पुणे : देशात आजमितीला अतिरिक्त वीज निर्मिती होत आहे़ त्यामुळे मुळशीतील टाटा समुहाच्या मालकीच्या धरणातून पुणे शहरासाठी पाच-सहा ...

पुणे : देशात आजमितीला अतिरिक्त वीज निर्मिती होत आहे़ त्यामुळे मुळशीतील टाटा समुहाच्या मालकीच्या धरणातून पुणे शहरासाठी पाच-सहा टीएमसी पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १) अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला़ त्यानंतर ते बोलत होते़ महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, चेतन तुपे, मुक्ता टिळक तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,“भामा-आसखेड धरणाचे पाणी पुण्याला मिळणार असल्याने खडकवासला धरण साखळीतून होणारा पाणीपुरवठा कमी करून शेतीसाठीचे आवर्तन वाढवावे असे पाटबंधारे विभागाकडून सुचवण्यात आले. मात्र पुण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही. त्याचवेळी जिल्ह्यातील शेतीलाही पाणी मिळाले पाहिजे. या दृष्टीने टाटांच्या मुळशी धरणातील पाणी मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात नेमलेल्या समितीला मी लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे.”

“भामा-आसखेड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महापालिकेने मोबदला दिला. त्यामुळे महापालिकेला राज्य शासनाला पाण्यासाठी द्यावे लागणारे २६० कोटी रूपये यापुढे द्यावे लागणार नाहीत याची खबरदारी मी घेईन. त्यासाठी मंंत्रीमंडळातल्या सहकाऱ्यांना समजावून सांगेन,” असे आश्वासन पवार यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होणार आहे. त्यामुळे शहरांनी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे. त्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत. मैलापाणी शुध्दीकरण आणि कचरा व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे. “पुणे हे देशातील क्रमांक एकचे स्मार्ट शहर म्हणून आपण स्थापित करू शकतो़ त्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, मेट्रो, इलेक्ट्रिक बस, एचसीएमटीआर आदी प्रकल्प महापालिकेने सर्वांना विश्वासात घेऊन साकारावेत,” असे ते म्हणाले.

भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुधेश कडू, पाणीपुरवठा अधिकारी विजय कुलकर्णी आणि माजी पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण गेडाम यांचा यावेळी पवार व फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़