शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

जिल्ह्यातील एटीएम केंद्रे सुरळीत होईनात

By admin | Updated: May 13, 2017 04:20 IST

शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले. परंतु, मागील महिनाभरापासून अनेक एटीएम केंद्रे शनिवारी, रविवारी ‘शटर बंद’ अवस्थेत असतात. त्यामुळे सुटीच्या काळात ग्राहकांना तत्काळ पैसे उपलब्ध होत नाहीत. आज याबाबत पाहणी केली असता शहरातील बँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र बंद अवस्थेत आढळले. तर महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्रच पूर्वीच्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील ग्राहकांची नाराजी आहे. विशेषत: महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र सतत बंद असते. सुट्या जोडून आल्यास अनेक एटीएम केंद्रांवर चलनच नसल्याचे आढळून येते. रोख रक मेचा तुटवडा असल्याने एटीएम बंद असल्याचे बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. तर बँक आॅफ महाराष्ट्राचे शहरातील एटीएम स्थलांतरित केल्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम वगळता बहुतांश एटीएम यंत्रणा सलाईनवर होती. सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बंद असलेले एटीएम सुरळीत झाले. अद्यापपर्यंत हे एटीएम बंद न राहता सुरळीत सुरू आहेत. युको बँक, सेंट्रल बँक आॅफ इंंडियाचे एटीएम काही दिवसांपासून बंद असल्याचे चित्र आहे. सध्या हे दोन्ही एटीएम सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे.शहरातील भिगवण रस्त्यालगतचे बँक आॅफ इंडियाचे एटीएम गेल्या ३ ते ४ दिवसांपासून बंद आहे. ‘कॅश’च्या तुटवड्यामुळे हे एटीएम बंद राहत आहेत. या बँकेची शहर आणि तालुक्यात एकूण ५ एटीएम आहेत.या सर्व एटीएमला बारामतीच्याच शाखेतून चलनपुरवठा केला जातो. सध्या चलनतुटवड्यामुळे एटीएम बंद आहे. सोमवारी (दि. १५) एटीएम पूर्ववत सुुरू होतील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले, तर शहरात सध्या रोख रकमेचा कोणताही तुटवडा नाही, एटीएमसाठी मागणीप्रमाणे रोख रक्कम पुरविली जात आहे. रक्कम तुटवड्यामुळे एटीएम बंद राहत असल्याची कोणतीही तक्रार नाही, असे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्रचे शहरातील सिनेमा रस्त्यावरील एटीएम बंद करण्यात आले आहे. हे एटीएम जळोची हद्दीत स्थलांतरित करण्यात आले आहे. शहरात एटीएम सुरू असतानादेखील सतत बंद राहत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. आता हे एटीएम मुख्य शहर परिसराबाहेर गेल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या बँकेच्या ग्राहकांची शहरात अधिक संख्या आहे. नाईलाजास्तव या ग्राहकांना इतर बँक एटीएमचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे अधिक वेळा इतर बँकांच्या एटीएमचा वापर केल्यास नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.राजगुरूनगरला ‘नो कॅश’चा फलकलोकमत न्यूज नेटवर्कदावडी : राजगुरुनगर शहरात असलेल्या जवळपास सर्वच बँकांच्या एटीएम मशीनमध्ये कॅश मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. राजगुरुनगर शहरात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आदी सरकारी बँकांबरोबर एचडीएफसी बँक आदी बँका आहेत. शासन पुरस्कृत बँकांकडे पुरेशी रक्कम रिझर्व्ह बँक देत नसल्यामुळे जनतेमध्ये पैशाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. एटीएममध्ये जास्त पैसे टाकण्यात येत नसल्याने आणि सर्वच ग्राहकांना वेळेत बँकेत जाता येत नसल्याने आपल्या हक्काचे पैसे खात्यात असूनही ते काढता येत नाहीत.