शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

जिल्ह्यातील एटीएम केंद्रे सुरळीत होईनात

By admin | Updated: May 13, 2017 04:20 IST

शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले. परंतु, मागील महिनाभरापासून अनेक एटीएम केंद्रे शनिवारी, रविवारी ‘शटर बंद’ अवस्थेत असतात. त्यामुळे सुटीच्या काळात ग्राहकांना तत्काळ पैसे उपलब्ध होत नाहीत. आज याबाबत पाहणी केली असता शहरातील बँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र बंद अवस्थेत आढळले. तर महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्रच पूर्वीच्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील ग्राहकांची नाराजी आहे. विशेषत: महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र सतत बंद असते. सुट्या जोडून आल्यास अनेक एटीएम केंद्रांवर चलनच नसल्याचे आढळून येते. रोख रक मेचा तुटवडा असल्याने एटीएम बंद असल्याचे बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. तर बँक आॅफ महाराष्ट्राचे शहरातील एटीएम स्थलांतरित केल्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम वगळता बहुतांश एटीएम यंत्रणा सलाईनवर होती. सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बंद असलेले एटीएम सुरळीत झाले. अद्यापपर्यंत हे एटीएम बंद न राहता सुरळीत सुरू आहेत. युको बँक, सेंट्रल बँक आॅफ इंंडियाचे एटीएम काही दिवसांपासून बंद असल्याचे चित्र आहे. सध्या हे दोन्ही एटीएम सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे.शहरातील भिगवण रस्त्यालगतचे बँक आॅफ इंडियाचे एटीएम गेल्या ३ ते ४ दिवसांपासून बंद आहे. ‘कॅश’च्या तुटवड्यामुळे हे एटीएम बंद राहत आहेत. या बँकेची शहर आणि तालुक्यात एकूण ५ एटीएम आहेत.या सर्व एटीएमला बारामतीच्याच शाखेतून चलनपुरवठा केला जातो. सध्या चलनतुटवड्यामुळे एटीएम बंद आहे. सोमवारी (दि. १५) एटीएम पूर्ववत सुुरू होतील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले, तर शहरात सध्या रोख रकमेचा कोणताही तुटवडा नाही, एटीएमसाठी मागणीप्रमाणे रोख रक्कम पुरविली जात आहे. रक्कम तुटवड्यामुळे एटीएम बंद राहत असल्याची कोणतीही तक्रार नाही, असे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्रचे शहरातील सिनेमा रस्त्यावरील एटीएम बंद करण्यात आले आहे. हे एटीएम जळोची हद्दीत स्थलांतरित करण्यात आले आहे. शहरात एटीएम सुरू असतानादेखील सतत बंद राहत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. आता हे एटीएम मुख्य शहर परिसराबाहेर गेल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या बँकेच्या ग्राहकांची शहरात अधिक संख्या आहे. नाईलाजास्तव या ग्राहकांना इतर बँक एटीएमचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे अधिक वेळा इतर बँकांच्या एटीएमचा वापर केल्यास नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.राजगुरूनगरला ‘नो कॅश’चा फलकलोकमत न्यूज नेटवर्कदावडी : राजगुरुनगर शहरात असलेल्या जवळपास सर्वच बँकांच्या एटीएम मशीनमध्ये कॅश मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. राजगुरुनगर शहरात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आदी सरकारी बँकांबरोबर एचडीएफसी बँक आदी बँका आहेत. शासन पुरस्कृत बँकांकडे पुरेशी रक्कम रिझर्व्ह बँक देत नसल्यामुळे जनतेमध्ये पैशाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. एटीएममध्ये जास्त पैसे टाकण्यात येत नसल्याने आणि सर्वच ग्राहकांना वेळेत बँकेत जाता येत नसल्याने आपल्या हक्काचे पैसे खात्यात असूनही ते काढता येत नाहीत.