शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:28 IST

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला.

पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला. दुस-या दिवसअखेर आसामने ३ बाद १०१ धावा करीत आपली आघाडी १२७ वर नेऊन ठेवली.पूना क्लबच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. आसामला तीनशेच्या आत रोखल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांप्रमाणेच आसामच्या गोलंदाजांनीही पोषक खेळपट्टीचा लाभ उचलत आपल्या संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सलामीवीर ऋतुराजचा (१२६ धावा, २१० चेंडू, १ षटकार, १४ चौकार) अपवाद वगळता इतर भरवशाच्या फलंदाजांनीनांगी टाकली.कालच्या ३ बाद ६४ वरून आज पुढे खेळणा-या महाराष्ट्राला पहिल्या सत्रात २ धक्के बसले. काल ७ धावांवर नाबाद असलेला रोहित मोटवानी १५ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीही ४ धावा करून तंबूत परतला. हे दोन्ही बळी पल्लवकुमार दास याने टिपले. ५ बाद ९३ अशा वाईट स्थितीतून ऋतुराज-प्रयाग भाटी या जोडीने महाराष्ट्राला बाहेर काढले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. भाटीने ५६ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या.भाटी बाद झाल्यावर ऋतुराजने श्रीकांत मुंढेसह (३० चेंडूंत ४ चौकारांसह २७) सातव्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला आघाडी मिळवून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. सत्यजित बच्छावने १४ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. मात्र, आसामच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत महाराष्ट्राचे पहिल्या डावात आघाडी घेण्याचे इरादे उधळून लावले. राहुल सिंग याने ऋतुराजला बाद करीत महाराष्ट्राच्या डावाला पूर्णविराम दिला. आसामतर्फे राहुल सिंगने सर्वाधिक ४, प्रीतम दास आणि पल्लवकुमार दास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया डावात आसामने आश्वासक प्रारंभ केल्यानंतर अखेरच्या सत्रात महाराष्ट्राच्या गोलंदाजांंनी ३ बळी मिळवत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने ३५ षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढेने १७ धावांत २, तर राहुल त्रिपाठीने ७ धावांत १ गडी बाद केला.सामन्याचे अद्याप २ दिवस शिल्लक आहेत. खेळपट्टीचा नूर पाहता या सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. आसामचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याची जबाबदारी गोलंदाजांनी पार पाडली आणि फलंदाज लौकिकाला जागले तर यजमान महाराष्ट्र हा सामनाजिंकू शकतो. दुसरीकडे दुसºया डावात चांगली फलंदाजी करून महाराष्ट्रासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवून गोलंदाजीच्या जोरावर बाजी मारण्याची संधी आसामला असेल.संक्षिप्त धावफलकआसाम : पहिला डाव : सर्व बाद २७९.महाराष्ट्र : पहिला डाव : ६८.२ षटकांत सर्व बाद २५३ (ऋतुराज गायकवाड १२६, प्रयाग भाटी ३१, सत्यजित बच्छाव १५, रोहित मोटवानी १५, चिराग खुराणा ८, अंकित बावणे ६, राहुल त्रिपाठी ४, निकित धुमाळ १, नौशाद शेख ०, प्रदीप दाढे नाबाद ०, राहुलसिंग ४/६३, प्रीतम दास २/६२, पल्लवकुमार दास २/६०, रजत खान १/२, अरूप दास १/५४).आसाम : दुसरा डाव : ३५ षटकांत ३ बाद १०१ (रिषव दास ३५, अभिषेक ठाकुराई ३५, पल्लवकुमार दास २६, प्रदीप दाढे २/१७, राहुल त्रिपाठी १/७).

टॅग्स :Cricketक्रिकेट