शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:28 IST

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला.

पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला. दुस-या दिवसअखेर आसामने ३ बाद १०१ धावा करीत आपली आघाडी १२७ वर नेऊन ठेवली.पूना क्लबच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. आसामला तीनशेच्या आत रोखल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांप्रमाणेच आसामच्या गोलंदाजांनीही पोषक खेळपट्टीचा लाभ उचलत आपल्या संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सलामीवीर ऋतुराजचा (१२६ धावा, २१० चेंडू, १ षटकार, १४ चौकार) अपवाद वगळता इतर भरवशाच्या फलंदाजांनीनांगी टाकली.कालच्या ३ बाद ६४ वरून आज पुढे खेळणा-या महाराष्ट्राला पहिल्या सत्रात २ धक्के बसले. काल ७ धावांवर नाबाद असलेला रोहित मोटवानी १५ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीही ४ धावा करून तंबूत परतला. हे दोन्ही बळी पल्लवकुमार दास याने टिपले. ५ बाद ९३ अशा वाईट स्थितीतून ऋतुराज-प्रयाग भाटी या जोडीने महाराष्ट्राला बाहेर काढले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. भाटीने ५६ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या.भाटी बाद झाल्यावर ऋतुराजने श्रीकांत मुंढेसह (३० चेंडूंत ४ चौकारांसह २७) सातव्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला आघाडी मिळवून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. सत्यजित बच्छावने १४ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. मात्र, आसामच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत महाराष्ट्राचे पहिल्या डावात आघाडी घेण्याचे इरादे उधळून लावले. राहुल सिंग याने ऋतुराजला बाद करीत महाराष्ट्राच्या डावाला पूर्णविराम दिला. आसामतर्फे राहुल सिंगने सर्वाधिक ४, प्रीतम दास आणि पल्लवकुमार दास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया डावात आसामने आश्वासक प्रारंभ केल्यानंतर अखेरच्या सत्रात महाराष्ट्राच्या गोलंदाजांंनी ३ बळी मिळवत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने ३५ षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढेने १७ धावांत २, तर राहुल त्रिपाठीने ७ धावांत १ गडी बाद केला.सामन्याचे अद्याप २ दिवस शिल्लक आहेत. खेळपट्टीचा नूर पाहता या सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. आसामचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याची जबाबदारी गोलंदाजांनी पार पाडली आणि फलंदाज लौकिकाला जागले तर यजमान महाराष्ट्र हा सामनाजिंकू शकतो. दुसरीकडे दुसºया डावात चांगली फलंदाजी करून महाराष्ट्रासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवून गोलंदाजीच्या जोरावर बाजी मारण्याची संधी आसामला असेल.संक्षिप्त धावफलकआसाम : पहिला डाव : सर्व बाद २७९.महाराष्ट्र : पहिला डाव : ६८.२ षटकांत सर्व बाद २५३ (ऋतुराज गायकवाड १२६, प्रयाग भाटी ३१, सत्यजित बच्छाव १५, रोहित मोटवानी १५, चिराग खुराणा ८, अंकित बावणे ६, राहुल त्रिपाठी ४, निकित धुमाळ १, नौशाद शेख ०, प्रदीप दाढे नाबाद ०, राहुलसिंग ४/६३, प्रीतम दास २/६२, पल्लवकुमार दास २/६०, रजत खान १/२, अरूप दास १/५४).आसाम : दुसरा डाव : ३५ षटकांत ३ बाद १०१ (रिषव दास ३५, अभिषेक ठाकुराई ३५, पल्लवकुमार दास २६, प्रदीप दाढे २/१७, राहुल त्रिपाठी १/७).

टॅग्स :Cricketक्रिकेट