शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाद्य कारागीर पडद्यामागील कलाकार

By admin | Updated: December 28, 2015 01:47 IST

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही.

पुणे : प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही. अशा वाद्यांची देखभाल करणाऱ्या वाद्य कारगीराचे स्थान संगीत क्षेत्रात महत्त्वाचे आहे. वाद्य कारागीर हे त्या मैफिलीतील पडद्यामागील कलाकर असतात, त्यांचा गौरव संगीताच्या व्यासपीठावर गौरव होणे महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांनी व्यक्त केले.गानवर्धन आणि नलिनी छगन सुरा ट्रस्ट यांच्या वतीने पहिला वाद्य कारागीर पुरस्कार वाद्यदुरुस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम जोग यांना रविवारी प्रदान करण्यात आला. तसेच सरला कुलकर्णी स्मृती पुरस्कार भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अनुराधा कुबेर यांना देण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या सोहळ्यात पं. व्यास यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. विवेक सुरा, गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी उपस्थित होते. व्यास म्हणाले, वादक किंवा गायक कोणताही असो त्यांच्या दृष्टीने वाद्य संवेदनशील असते. ते योग्य स्वरात लागणे यावर मैफिलीची यशस्विता अवलंबून असते, त्यामुळे अशा वाद्य कारागिराला पुरस्कार देणे उचितच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ दर्शविणारा स्वर-साज-नक्षत्र हा कार्यक्रम या प्रसंगी झाला. दयानंद घोटकर, रमा कुलकर्णी, रश्मी मोघे, अजय ढमढेरे, पूर्वा घोटकर यांनी गीते सादर केली. गायनाबरोबरच वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेल्या गीतांनी कार्यक्रमात एक वेगळीच रौनक आणली. ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘मेरी सपनो की रानी कब आयेगी तू’ ही इतर लोकप्रिये गीते वाद्यावर सादर करण्यात आली.सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. (प्रतिनिधी)