शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

कला प्रवाही असायला हवी

By admin | Updated: June 3, 2017 02:56 IST

ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात, त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणाऱ्या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडेदेखील गायला हवेत. कला ही प्रवाही, नवीन गोष्टींना सामावून घेणारी असायला हवी. यासाठी विचारसन्मुख करणारे साहित्य वाचायला हवे. आपले पोवाडे, लावण्या हे आपले वैभव आहे. परंतु, त्यांना पुढे न्यायचे असेल तर नवीन गोष्टी अंगीकारत जुन्यांमध्ये देखील बदल करायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली.शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव, सरदार दाभाडे घराण्याच्या वंशज माँसाहेब वृषालीराजे दाभाडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शाहिरी निनाद -अमर शाहिरी या विशेषांकाचे प्रकाशन झाले. किसनराव हिंगे यांचे सहकारी ढोलकीवादक बंडा देशमुख यांचा विशेष गौरव करण्यात आला. शाहीर हेमंत मावळे आणि सहकारी यांनी या वेळी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. पोवाडा वर्गातील बालशाहिरांनादेखील गौरविण्यात आले. अतुल पेठे म्हणाले, ‘कला सामाजिक प्रबोधनासाठी आहे. आज जगातील अस्थिरता बघता आपल्याला शांत होण्याची गरज आहे. यासाठी शांततेचे गुणगान गाणारा आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा गायला हवा. जग बदलायचे असेल तर ते हिंसेने नाही तर सकारात्मक विचारांनी बदलायला हवे. हे बदल घडविण्यासाठी चांगले विचार समोर यायला हवेत’, असेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ‘आजच्या विद्यार्थ्यांमधील विचारक्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील, असे शिक्षण दिले पाहिजे. तरच, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. पोवाडा वर्गातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती दिली जाते. असे कलेचे वर्ग वाढायला हवेत.’ शाहिरा प्रा. रूपाली मावळे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे शौर्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हे शाहिरीच्या माध्यमातून झाले. या कलेतून इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ दिले. परंतु, आज समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची गरज आहे. नवीन पिढीला देशभक्तीने प्रेरित करायचे असेल, तर शाहिरी काव्याशिवाय पर्याय नाही.- शरद कुंटे