शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलींना पळविणाऱ्यास अटक

By admin | Updated: October 7, 2015 04:06 IST

शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकास अटक केली आहे. यापैकी एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्याशी

बारामती : शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकास अटक केली आहे. यापैकी एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्याशी आरोपीने प्रेमसंबंध निर्माण केले होते, तर दुसरी अल्पवयीन मुलगी ही त्या मुलीबरोबर शाळेत निघाली होती. तिलादेखील आरोपीने सोमवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता पळवून नेले होते. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत शाळकरी मुलींसह आरोपीला पकडण्यात यश मिळविले आहे. शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विश्वनाथ शिवाजी जाधव (वय १९, रा. मोतीबानगर, बारामती) याला अटक केली आहे. दोन्ही अल्पवयीन मुली सोमवारी सकाळी शाळेला निघाल्या होत्या. या वेळी विश्वनाथने दोघींचा पाठलाग केला. त्यानंतर छेडछाड करून इंदापूरच्या दिशेने नेले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान, पोलीस कर्मचारी एस. सी. ढवळे, पी. सी. सुतार, हेमलता भोंगळे या कर्मचाऱ्यांच्या पथकाला पळवून नेलेल्या मुलींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पोलीस पथकाला यश आले. इंदापूर तालुक्यातील लाकडी गावामध्ये आरोपीसह रस्त्यावरून जाताना दोन्ही अल्पवयीन मुली पोलिसांना सापडल्या आहेत. याप्रकरणी आरोपी जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरामनगर येथे एका विद्यालयात पाचवी व सातवीमध्ये या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. सातवीमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने प्रेमसंबंध निर्माण केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यातून आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले होते, तर पाचवी इयत्तेत शिकणारी अल्पवयीन मुलगी या मुलीसमवेत शाळेत जाते. मात्र, या दोघांबरोबर कोणी तरी पाहिल्याच्या भीतीने पालक रागावतील, त्यामुळे पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगीदेखील या दोघांबरोबर गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे का, याची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींचा पाठलाग करून, छेडछाड करून आरोपीने इंदापूरच्या दिशेने नेले. जाताना हे सर्व जण पायी गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हे तिघे जण लाकडी गावात आढळले आहेत. त्यापूर्वी आरोपीने बारामती लाकडी मार्गावरील पडक्या घरात त्या दोघींना ठेवले होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तपासानंतर पंचनाम्यामध्ये या बाबी उघडकीस येतील, असे पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान यांनी सांगितले.