शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दिवसात तब्बल चारशे जागरण गोंधळ

By admin | Updated: May 4, 2015 02:56 IST

निमगाव खंडोबा येथील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि. ३) एका दिवसात चारशे जागरण गोंधळ झाले असल्याचा विक्रम झाला आहे, अशी माहिती

दावडी : निमगाव खंडोबा येथील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि. ३) एका दिवसात चारशे जागरण गोंधळ झाले असल्याचा विक्रम झाला आहे, अशी माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिली.अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुळदैवत असलेले खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. येथे चैत्र व माघ महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक येतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक भक्त येथे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. सध्या लग्नसराई आणि वैशाख महिना असल्याने भाविक भक्त येथे येऊन दर्शन घेतात. नवीन लग्न झालेले राज्यभरातील नवदाम्पत्य येथे दर्शनासाठी येतात. याबरोबरच मोठ्या संख्येने भाविक जागरण गोंधळ घालण्यासाठी निमगाव खंडोबाला येतात.चैत्र पौर्णिमेनंतर पहिल्याच रविवारी येथे मोठी गर्दी झाली. याठिकाणी अनेक जिल्ह्यांतील चारशेपेक्षा जास्त जोडप्यांनी दिवसभरात जागरण गोंधळ घातला. जागरण गोंधळ घालण्याची फार वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असल्याने ती आजही येथील मंदिरात भाविकांनी जोपासली आहे. जागरण गोंधळ घातल्याशिवाय सुख शांती लाभत नसल्याचा भाविक भक्तांचा समज आहे. येथील मंदिरात दररोज ४० ते ५० जागरण गोंधळ होत आहेत. पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी येथे जवळपास शंभर ते दीडशे जागरण गोंधळ होत असतात. (वार्ताहर)