शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

जुन्या भांडणाच्या रागातून तिघांवर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: March 29, 2017 23:41 IST

हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक

बारामती : हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला. इतर तिघांवर वार करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले. आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, ३०७ व आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माळेगाव येथील यश गार्डन या हॉटेलात जेवणावरून प्रकाश हनुमंत अडागळे व विशाल सर्जेराव अडागळे यांची हॉटेल मालक प्रशांत मोरे यांच्यासोबत वाद झाला. आज सकाळी साडेअकराला गजबजलेल्या शिवाजी चौकात प्रशांत मोरे, विनोद (टॉमी) मोरे, सारंग शिंदे (सर्व रा. शिवनगर, माळेगाव) यांनी प्रकाश अडागळे हे मित्रासमवेत थांबले असता प्रशांत मोरे याने जातीवाचक बोलून ‘मी तुला भीत नाही,’ असे म्हणून तलवारीने डोक्यात, विनोद (टॉमी) मोरे याने सत्तूरने उजव्या दंडावर, तर सारंग शिंदे याने कोयत्याने गंभीर वार केले. तर, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या राहुल अडागळे, कुणाल सकट व सुनील खिलारे यांना मारहाण करून हे तिन्ही आरोपी हत्यारे उंचावत गावातून फरार झाले. काही जणांनी प्रकाश अडागळे यांना जखमी अवस्थेत बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले आहे. जखमीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. फरार आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, खुनाचा प्रयत्न करणे व आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माळेगाव पोलीस दूरक्षेत्रासाचे उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)माळेगावला जादा पोलिसांची गरज....शांतताप्रिय माळेगाव गटा-तटातील भांडणामुळे बदनाम झाले आहे. या गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी मोडीत काढली जाईल, असे तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले. मात्र, दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने माळेगावात दोन गटांमध्ये मारामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यामध्ये धारदार शस्त्रांचा काठ्या, लोखंडी गज आदींचा वापर केला जातो. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या माळेगावमध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्यासह अतिरिक्त पोलीस बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात शैक्षणिक संकुलामुळे बाहेरगावचे विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या गावची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.