शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जुन्या भांडणाच्या रागातून तिघांवर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: March 29, 2017 23:41 IST

हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक

बारामती : हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला. इतर तिघांवर वार करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले. आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, ३०७ व आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माळेगाव येथील यश गार्डन या हॉटेलात जेवणावरून प्रकाश हनुमंत अडागळे व विशाल सर्जेराव अडागळे यांची हॉटेल मालक प्रशांत मोरे यांच्यासोबत वाद झाला. आज सकाळी साडेअकराला गजबजलेल्या शिवाजी चौकात प्रशांत मोरे, विनोद (टॉमी) मोरे, सारंग शिंदे (सर्व रा. शिवनगर, माळेगाव) यांनी प्रकाश अडागळे हे मित्रासमवेत थांबले असता प्रशांत मोरे याने जातीवाचक बोलून ‘मी तुला भीत नाही,’ असे म्हणून तलवारीने डोक्यात, विनोद (टॉमी) मोरे याने सत्तूरने उजव्या दंडावर, तर सारंग शिंदे याने कोयत्याने गंभीर वार केले. तर, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या राहुल अडागळे, कुणाल सकट व सुनील खिलारे यांना मारहाण करून हे तिन्ही आरोपी हत्यारे उंचावत गावातून फरार झाले. काही जणांनी प्रकाश अडागळे यांना जखमी अवस्थेत बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले आहे. जखमीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. फरार आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, खुनाचा प्रयत्न करणे व आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माळेगाव पोलीस दूरक्षेत्रासाचे उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)माळेगावला जादा पोलिसांची गरज....शांतताप्रिय माळेगाव गटा-तटातील भांडणामुळे बदनाम झाले आहे. या गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी मोडीत काढली जाईल, असे तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले. मात्र, दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने माळेगावात दोन गटांमध्ये मारामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यामध्ये धारदार शस्त्रांचा काठ्या, लोखंडी गज आदींचा वापर केला जातो. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या माळेगावमध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्यासह अतिरिक्त पोलीस बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात शैक्षणिक संकुलामुळे बाहेरगावचे विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या गावची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.