शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: November 8, 2016 01:11 IST

परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते

बारामती : परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. याही वर्षी जिरायती भागातील काही गावांमध्ये पावसाने तोंड दाखवले नाही. जलयुक्त शिवार म्धून झालेल्या कामांमुळे काही ठिकाणी पाण्याचे साठे झाले आहेत. त्या पाण्याच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे. बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी पीक घेतले जाते. त्याखालोखाल मका, गहू, हरभरा व चारापिकांच्या लागवडी शेतकरी करीत असतो. बारामती तालुक्याच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता नीरा डावा कालव्यामुळे परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात प्रामुख्याने ऊस व फळबागांखालील क्षेत्र जास्त आहे. तर तालुक्याच्या जिरायती पट्ट्यांमध्ये तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतले जाते. मागील चार ते पाच वर्षांपासून जिरायती पट्टा दुष्काळाने होरपळत आहे. कोणतेच पीक हाती न लागल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. जिरायती पट्ट्यात दूध व्यवसाय मोठ्याप्रमाणावर केला जातो. मात्र, चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय देखील आर्थिक संकटात सापडला होता. येथील दुग्धोउत्पादकांना ३ हजार ५०० रुपये टनाने चारा विकत घेण्याची वेळ आली होती. दुग्धव्यवसायामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतात. या पिकांच्या उत्पादनानंतर त्याचा जनावरांना चारा म्हणूनदेखील वापर करता येतो. यंदा ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पेरणी क्षेत्र अद्यापही सरासरीपर्यंत पोहोचले नाही. यंदा तालुक्यात ज्वारीच्या ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याखालोखाल मक्याची १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकाने सरासरी ओलांडली असून, चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास १ महिना विलंब झाला आहे. त्यामुळे गहू पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिसरात ऊस तोडणीनंतरच त्या क्षेत्रात शेतकरी गव्हाची पेरणी करीत असतो. सध्या ऊसतोडी सुरू आहेत. मोकळ्या झालेल्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यात केवळ ४ टक्के क्षेत्रावरच गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, असे कृषी विभागाने सांगितले.