शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: November 8, 2016 01:11 IST

परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते

बारामती : परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. याही वर्षी जिरायती भागातील काही गावांमध्ये पावसाने तोंड दाखवले नाही. जलयुक्त शिवार म्धून झालेल्या कामांमुळे काही ठिकाणी पाण्याचे साठे झाले आहेत. त्या पाण्याच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे. बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी पीक घेतले जाते. त्याखालोखाल मका, गहू, हरभरा व चारापिकांच्या लागवडी शेतकरी करीत असतो. बारामती तालुक्याच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता नीरा डावा कालव्यामुळे परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात प्रामुख्याने ऊस व फळबागांखालील क्षेत्र जास्त आहे. तर तालुक्याच्या जिरायती पट्ट्यांमध्ये तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतले जाते. मागील चार ते पाच वर्षांपासून जिरायती पट्टा दुष्काळाने होरपळत आहे. कोणतेच पीक हाती न लागल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. जिरायती पट्ट्यात दूध व्यवसाय मोठ्याप्रमाणावर केला जातो. मात्र, चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय देखील आर्थिक संकटात सापडला होता. येथील दुग्धोउत्पादकांना ३ हजार ५०० रुपये टनाने चारा विकत घेण्याची वेळ आली होती. दुग्धव्यवसायामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतात. या पिकांच्या उत्पादनानंतर त्याचा जनावरांना चारा म्हणूनदेखील वापर करता येतो. यंदा ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पेरणी क्षेत्र अद्यापही सरासरीपर्यंत पोहोचले नाही. यंदा तालुक्यात ज्वारीच्या ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याखालोखाल मक्याची १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकाने सरासरी ओलांडली असून, चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास १ महिना विलंब झाला आहे. त्यामुळे गहू पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिसरात ऊस तोडणीनंतरच त्या क्षेत्रात शेतकरी गव्हाची पेरणी करीत असतो. सध्या ऊसतोडी सुरू आहेत. मोकळ्या झालेल्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यात केवळ ४ टक्के क्षेत्रावरच गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, असे कृषी विभागाने सांगितले.