शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अतिरिक्त पाण्यामुळे क्षारपड जमिनींचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: August 6, 2015 03:39 IST

पिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा

रविकिरण सासवडे, बारामतीपिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा धोकाही अधिक आहे. मात्र, बागायती क्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी पिकाला अतिरिक्त पाणी देत आहेत. बारामती तालुक्यातच या अतिरिक्त पाणीवापरामुळे अंदाजे साडेतीन ते चार हजार क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यामुळे जलसाक्षरता आणि जलनियंत्रणाच्या चळवळी व्यापक प्रमाणावर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षीच पाऊसकाळ लांबत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनस्तरावरून जलयुक्त शिवारसारख्या योजना लोकसहभागातून राबवल्या जात आहेत. पाणी साठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच पाण्याच्या वापरावरही योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गावपातळीपासून जलयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद मिळत आहे. जलस्रोत बळकटीकरणाला त्यामुळे चालना मिळाली. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब साठवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याबरोबरच पाणी वापरतानादेखील थेंबाचाही विचार करण्याची गरज आहे. उसासारख्या पिकाला एकरी एकावेळी पाटाद्वारे १० ते १२ लाख लिटर पाणी लागते. तर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास २६ ते २७ हजार लिटर पाणी लागते. मात्र, शेतकरी पाणी आहे म्हणून ठिबकने देखील अतिरिक्त पाणी देत आहेत. पिकांची गरज ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाणीवापराबाबत काटेकोर नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे जमिनीची स्थिती, पाण्याची उपलब्धता, हवामान याचा विचार करता पीक पद्धती ठरवण्याची गरज आहे.