शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त पाण्यामुळे क्षारपड जमिनींचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: August 6, 2015 03:39 IST

पिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा

रविकिरण सासवडे, बारामतीपिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा धोकाही अधिक आहे. मात्र, बागायती क्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी पिकाला अतिरिक्त पाणी देत आहेत. बारामती तालुक्यातच या अतिरिक्त पाणीवापरामुळे अंदाजे साडेतीन ते चार हजार क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यामुळे जलसाक्षरता आणि जलनियंत्रणाच्या चळवळी व्यापक प्रमाणावर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षीच पाऊसकाळ लांबत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनस्तरावरून जलयुक्त शिवारसारख्या योजना लोकसहभागातून राबवल्या जात आहेत. पाणी साठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच पाण्याच्या वापरावरही योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गावपातळीपासून जलयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद मिळत आहे. जलस्रोत बळकटीकरणाला त्यामुळे चालना मिळाली. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब साठवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याबरोबरच पाणी वापरतानादेखील थेंबाचाही विचार करण्याची गरज आहे. उसासारख्या पिकाला एकरी एकावेळी पाटाद्वारे १० ते १२ लाख लिटर पाणी लागते. तर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास २६ ते २७ हजार लिटर पाणी लागते. मात्र, शेतकरी पाणी आहे म्हणून ठिबकने देखील अतिरिक्त पाणी देत आहेत. पिकांची गरज ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाणीवापराबाबत काटेकोर नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे जमिनीची स्थिती, पाण्याची उपलब्धता, हवामान याचा विचार करता पीक पद्धती ठरवण्याची गरज आहे.