शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खरंच स्त्रिया इतक्या दुष्ट असतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहिल्यानंतर प्रचंड चीड येते. प्रत्येक मालिकेमध्ये स्त्रियांना खलनायिका म्हणून सादर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहिल्यानंतर प्रचंड चीड येते. प्रत्येक मालिकेमध्ये स्त्रियांना खलनायिका म्हणून सादर केले जाते. स्त्रिया खरंच इतक्या दुष्ट असतात का? असा प्रश्न वाहिन्यांना विचारावासा वाटतो, अशा शब्दांत शांताबाई नारायणराव सावरकर यांच्या सून स्वामिनी विक्रम सावरकर यांनी वाहिन्यांवर टीका केली. आपल्या धर्माने स्त्रीचे रूप ‘अबला’ म्हणून नव्हे ‘आदर्श’ म्हणून समोर आणले आहे असेही त्या म्हणाल्या.

मृत्यूंजय प्रकाशनाच्या वतीने ‘तू धैर्याची अससी मूर्ती’ या कै. यशोदा गणेश सावरकर (येसूवहिनी) यांच्या पहिल्या साधार अधिकृत चरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्वामिनी विक्रम सावरकर आणि लेखिका शेफाली वैद्य यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सावरकरांचे अभ्यासक अक्षय जोग, लेखिका अपर्णा चौथे व प्रकाशक सात्यकी सावरकर उपस्थित होते.

आजच्या राजकीय गदारोळात आपला पक्ष, त्यामागे दडलेला स्वार्थ अशी लोकं सापडतात पण त्यामध्येही काही अपवाद असतात. सध्याची अंदाधुंद परिस्थिती असली तरी कणखर सावरकर प्रेमी आशावादी आहेत. आजची तरुण पिढी सक्रिय झाली आहे. ही पिढी विचारशील आहे. आपण त्यांना सकस साहित्य पुरवित राहिल्यास त्यातून सक्षम पिढी घडेल, असा विश्वास स्वामिनी सावरकर यांनी व्यक्त केला. तसेच यशोदा सावरकर खूप हलाखीच्या स्थितीत राहिल्या तरी त्या ‘अबला’ नव्हत्या असेही त्या म्हणाल्या.

आज कितीतरी स्त्रिया अशा आहेत की इतिहासाने नोंद घेतली नाही त्यांच्या वेदना मूक राहिल्या, असे सांगून शेफाली वैद्य म्हणाल्या, हिंदुत्त्ववादी विचारांची इको सिस्टीम बनली पाहिजे, असे आपण म्हणतो पण जोपर्यंत स्वत: अशा प्रकारची पुस्तके काढत नाही तोपर्यंत इको सिस्टीम तयार होणार नाही.

अक्षय जोग आणि सात्यकी सावरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अपर्णा चौथे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. अक्षय वाटवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

-----------------------------------------