शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पीएमपीकडून मनमानी वसुली

By admin | Updated: November 25, 2015 01:11 IST

पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

पुणे : पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बससेवेसाठी निविदा मागवून खासगी कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात असल्याचे कारण पुढे करीत पीएमपी प्रशासनाने या प्रकारणातून हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी याबाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे केली असून ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पीएमपीकडून या मार्गावर सध्या १० बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.राज्यशासनाने २० डिसेंबर २००५ मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार, सार्वजनिक वाहतूकीसाठी जास्तीत जास्त किती तिकीटदर आकारता येईल, याचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार, २२ किलोमीटरसाठी ३० रुपये तर ३२ किलोमीटरसाठी ४२ रुपये दर निश्चित केलेला आहे. तर ही सुविधा वातानुकूलीत केल्यास त्यासाठी तिकिटावर १५० टक्के सरचार्ज आकारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, पीएमपीएमएल कोथरूड ते विमानतळासाठी ७५ रूपये आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी १०५ रुपये दर आकारू शकते. पण प्रत्यक्षात कोथरूडसाठी १२० तर हिंजवडीसाठी १८० रुपयांचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे ही तिकीट वसूली अन्यायकारक असून त्याबाबत पीएमपीने खुलासा करण्याची मागणी केली असल्याचे परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ यांनी सांगितले. या बाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे दिली असून सोबत राज्यशासनाच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी आहे. (प्रतिनिधी)