शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

बसचालकांची मनमानी

By admin | Updated: November 27, 2015 01:30 IST

खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे

पिंपरी : खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रात्री १०नंतर सुटणाऱ्या बस थांब्यावर थांबविण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणारे कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असून, पीएमपीच्या घोडदौडीला खीळ बसत असल्याची प्रचिती मंगळवारी आली.निगडी-कात्रज ही ४२ नंबरची बस मंगळवारी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी निगडीवरून निघाली. उद्योगनगरीतील अनेक कामगार या बसने प्रवास करतात. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर चौकातील बसथांब्यावर १५ ते २० प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. या वेळी बस क्र. ४२-११ (आर २८२) निगडी येथून पिंपरी चौकात रात्री ११:१० वाजता आली. परंतु, पिंपरी चौकातील थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही बस न थांबविता मधल्या लेनमधून सुसाट नेली. त्यामुळे प्रवाशांना पुढील बस येईपर्यंत अर्धा तास ताटकळावे लागले. ही बस आकुर्डी थांब्यावरही थांबविली नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. निगडी-कात्रज बस उशिरा सुटली असल्याने संबंधित बसचालकाने बस थांबविली नसावी, असे गुळगुळीत उत्तर प्रशासनाने दिले.बसथांब्यावर चालकाने बस का थांबविली नाही, की वाहकाने त्याला थांबू दिली नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. त्या विषयीची तक्रार स्वारगेट केंद्रात दिली असून, अद्याप कोणतीही चौकशी व कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. चालक-वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवासी व नोकरदार वर्गाला बसत असून, पीएमपी प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)