शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकांची मनमानी

By admin | Updated: November 27, 2015 01:30 IST

खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे

पिंपरी : खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रात्री १०नंतर सुटणाऱ्या बस थांब्यावर थांबविण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणारे कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असून, पीएमपीच्या घोडदौडीला खीळ बसत असल्याची प्रचिती मंगळवारी आली.निगडी-कात्रज ही ४२ नंबरची बस मंगळवारी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी निगडीवरून निघाली. उद्योगनगरीतील अनेक कामगार या बसने प्रवास करतात. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर चौकातील बसथांब्यावर १५ ते २० प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. या वेळी बस क्र. ४२-११ (आर २८२) निगडी येथून पिंपरी चौकात रात्री ११:१० वाजता आली. परंतु, पिंपरी चौकातील थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही बस न थांबविता मधल्या लेनमधून सुसाट नेली. त्यामुळे प्रवाशांना पुढील बस येईपर्यंत अर्धा तास ताटकळावे लागले. ही बस आकुर्डी थांब्यावरही थांबविली नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. निगडी-कात्रज बस उशिरा सुटली असल्याने संबंधित बसचालकाने बस थांबविली नसावी, असे गुळगुळीत उत्तर प्रशासनाने दिले.बसथांब्यावर चालकाने बस का थांबविली नाही, की वाहकाने त्याला थांबू दिली नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. त्या विषयीची तक्रार स्वारगेट केंद्रात दिली असून, अद्याप कोणतीही चौकशी व कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. चालक-वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवासी व नोकरदार वर्गाला बसत असून, पीएमपी प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)