शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

कर्जरोखे उभारण्यास मंजुरी

By admin | Updated: May 31, 2017 03:04 IST

चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी पुढील पाच वर्षांत २२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे (बॉन्ड्स) उभारण्यास मंगळवारी स्थायी समितीने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी पुढील पाच वर्षांत २२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे (बॉन्ड्स) उभारण्यास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. येत्या ७ जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. या योजनेसाठी टाक्या बांधण्याचे काम सुरू केले आहे. या योजनेला आणखी विलंब होऊ नये यासाठी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मंगळवारी स्थायी समितेमध्ये ऐन वेळी समान पाणीपुरवठ्याचा विषय प्रशासनाने दाखल केला. त्यानंतर पाच मिनिटांतच हा विषय भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. या विषयाला शिवसेनेने विरोध केला तर राष्ट्रवादीने मात्र पाठिंबा दिला. काँग्रेस सदस्य अविनाश बागवे या बैठकीला अनुपस्थित राहिले. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या सुमारे ३३०० कोटी रुपयांच्या योजनेला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी स्मार्ट सिटी योजनेतून २०० कोटी रुपये, अमृत योजनेतून २९९ कोटी रुपये तर महापालिकेचे ६५० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित २२६४ कोटी रुपये हे कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय डिसेंबर २०१२ मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. पाच वर्षांत उभारण्यात येणारे या कर्जरोख्यांसाठी पहिल्या वर्षी ८.७ टक्के दराने परतावा दिला जाणार आहे. कर्जरोखे उभारण्याची प्रक्रिया पाच वर्षांत होणार आहे. व्याज त्या वेळीच सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या वर्षांत कर्जरोखे उभारणार, त्या कर्जरोख्यांवर तेवढे व्याज लागू होणार असल्याचे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.चौकशी अहवालापूर्वीच मंजुरीपाण्याच्या टाक्या व पाइपलाइनच्या कामांबाबत संशयाचे वातावरण असून याप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच केवळ मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुणे महापालिकेला दिवाळखोरीत ढकलण्यासाठीच चर्चेविनाच अवघ्या काही मिनिटांत प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेने करत कर्जरोख्यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.कर्जरोखे जागतिक बँकेकडून किंवा कमी व्याजदर असणाऱ्या बँकांकडून उभारण्यात येणार आहे. सहा किंवा त्यापेक्षा कमी व्याजदाराने कर्ज मिळाले तर ठरवण्यात आलेली रक्कम आणखी कमी होईल, असा विश्वास आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केला आहे.