शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘इंदापूर’साठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:09 IST

पाणीप्रश्न सुटणार मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती कळस : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेतीसिचंन व निरा ...

पाणीप्रश्न सुटणार

मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

कळस : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेतीसिचंन व निरा डावा कालव्यावरील बावीस गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता तालुक्यासाठी हा एैतिहासिक निर्णय असल्याने शेतीला अच्छे दिन येणार आहेत.

या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खडकवासला कालव्यावरील शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात टंचाई निर्माण होत होती. तसेच निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भरणे यांच्या प्रयत्नान यश आले आहे. दि २२ एप्रिल रोजी या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली आहे. सदर योजनेसाठी येथील जनतेची आग्रही मागणी होती. याबाबत माहिती देताना मंत्री भरणे यांनी सांगितले, कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एच. पी. क्षमतेच्या विदयुत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे १० कि. मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडसिंगेपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातून नीरा डाव्या कालव्यावरील बावीस गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च होणार आहे. या योजनेसाठी दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.

...तालुक्यातील सिंचन

प्रश्न सुटणार

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. चार महिन्यांत योजनेचा सर्व्हे तातडीने पूर्ण केला जाणार आहे. लाकडी निंबोडीनंतर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार आहे.

दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री