शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

आता वाट पाहण्यात वेळ न घालवता नियुक्तिपत्र द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. असे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. असे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा परीक्षेत अंतिम निवड झालेल्या ४१३ उमेदवारांना नियुक्ती देण्यास राज्य सरकार सावध पावले उचलत होते. त्यामुळे गेल्या दीडवर्षापासून कोणतीही चूक नसताना पद मिळूनही नुकसान सहन करावे लागले. एकूण ४१३ जागांपैकी केवळ एसईबीसीच्या १३ टक्के उमेदवारांमुळे ८७ टक्के उमेदवारांना वेठीस धरण्यात आले. आता अंतिम निर्णय आला असून यामध्ये वेळ न घालवता नियुक्तिपत्र देण्यात यावे. अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सेवा परीक्षा २०१९ मध्ये ४२० पदांसाठी घेण्यात आली. अंतिम यादीत ४१३ जणांची निवड करण्यात आली. या ४१३ पदांमध्ये एसईबीसीचे ४८ म्हणजे १३ टक्के उमेदवार, तर इतर समाजातील ३६५ म्हणजे ८७ टक्के पात्र उमेदवार आहेत. ३६५ मध्ये ७२ मराठा उमेदवार खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झाले आहेत. इतर समाजातील ८७ टक्के (३६५) उमेदवार जसे की, राज्य सेवा परीक्षा पास होऊन उप जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा पदांवर निवड झालेल्या ओबीसी, एनटी, व्हीजे, एससी, एसटी, अल्पसंख्यांक, खुल्या प्रवर्गातील ८७ टक्के उमेदवार आहेत. आकडेवारीचा विचार केला असता ४१३ पैकी ३६५ उमेदवार हे ४८ उमेदवारांपेक्षा संख्येने अधिक आहेत. तरी सुद्धा राज्य सरकारने आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ३६५ उमेदवारांचे दीडवर्ष विनाकारण वाया घालविले आहे. सरकारला या उमेदवारांना नियुक्ती देता आली असती. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी नियुक्ती दिली नाही. असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.

मराठा आरक्षणाचा आता अंतिम निर्णय आला आहे. सरकारकडून राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार केला जाईल. तसेच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. या सर्व प्रक्रियेत पुन्हा नियुक्ती रखडू नये. आरक्षण रद्द झाले म्हणून दुःख आहेच. एसईबीसीच्या उमेदवारांना देखील उचित न्याय मिळावा, अशी उमेदवारांची भूमिका आहे.

यावर विचार करण्यात सरकारने अधिक वेळ घालवला तर इतर समाजातील उमेदवारांचे सामाजिक, आर्थिक तसेच मानसिक नुकसान होत आहे. आम्ही प्रचंड मेहनत घेऊन ५ ते ६ वर्षे अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना, आम्ही काबाडकष्ट करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी जिवाचे रान करून आभ्यास केला. उप जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा पदांसाठी निवडले गेलो. तरीही शासन आम्हाला नियुक्ती देत नाही. आम्ही प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जात आहोत. अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.