शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

आता वाट पाहण्यात वेळ न घालवता नियुक्तिपत्र द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. असे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. असे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा परीक्षेत अंतिम निवड झालेल्या ४१३ उमेदवारांना नियुक्ती देण्यास राज्य सरकार सावध पावले उचलत होते. त्यामुळे गेल्या दीडवर्षापासून कोणतीही चूक नसताना पद मिळूनही नुकसान सहन करावे लागले. एकूण ४१३ जागांपैकी केवळ एसईबीसीच्या १३ टक्के उमेदवारांमुळे ८७ टक्के उमेदवारांना वेठीस धरण्यात आले. आता अंतिम निर्णय आला असून यामध्ये वेळ न घालवता नियुक्तिपत्र देण्यात यावे. अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सेवा परीक्षा २०१९ मध्ये ४२० पदांसाठी घेण्यात आली. अंतिम यादीत ४१३ जणांची निवड करण्यात आली. या ४१३ पदांमध्ये एसईबीसीचे ४८ म्हणजे १३ टक्के उमेदवार, तर इतर समाजातील ३६५ म्हणजे ८७ टक्के पात्र उमेदवार आहेत. ३६५ मध्ये ७२ मराठा उमेदवार खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झाले आहेत. इतर समाजातील ८७ टक्के (३६५) उमेदवार जसे की, राज्य सेवा परीक्षा पास होऊन उप जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा पदांवर निवड झालेल्या ओबीसी, एनटी, व्हीजे, एससी, एसटी, अल्पसंख्यांक, खुल्या प्रवर्गातील ८७ टक्के उमेदवार आहेत. आकडेवारीचा विचार केला असता ४१३ पैकी ३६५ उमेदवार हे ४८ उमेदवारांपेक्षा संख्येने अधिक आहेत. तरी सुद्धा राज्य सरकारने आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ३६५ उमेदवारांचे दीडवर्ष विनाकारण वाया घालविले आहे. सरकारला या उमेदवारांना नियुक्ती देता आली असती. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी नियुक्ती दिली नाही. असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.

मराठा आरक्षणाचा आता अंतिम निर्णय आला आहे. सरकारकडून राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार केला जाईल. तसेच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. या सर्व प्रक्रियेत पुन्हा नियुक्ती रखडू नये. आरक्षण रद्द झाले म्हणून दुःख आहेच. एसईबीसीच्या उमेदवारांना देखील उचित न्याय मिळावा, अशी उमेदवारांची भूमिका आहे.

यावर विचार करण्यात सरकारने अधिक वेळ घालवला तर इतर समाजातील उमेदवारांचे सामाजिक, आर्थिक तसेच मानसिक नुकसान होत आहे. आम्ही प्रचंड मेहनत घेऊन ५ ते ६ वर्षे अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना, आम्ही काबाडकष्ट करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी जिवाचे रान करून आभ्यास केला. उप जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा पदांसाठी निवडले गेलो. तरीही शासन आम्हाला नियुक्ती देत नाही. आम्ही प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जात आहोत. अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.