शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज द्या, मग दारूवर कारवाईचं बघू!

By admin | Updated: July 23, 2015 04:37 IST

मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक

पुणे : मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरू आहे. पुण्यातील जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात मात्र या गावठी दारूचा महापूर आला आहे. विशेष म्हणजे या दारू विक्रेत्यांविरोधात कोणी दत्तवाडी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, तर आधी नावासह लेखी तक्रार द्या; मग कारवाईचं बघू, अशी भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे शहरात गावठी दारूविक्रेत्यांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, कुंपणच शेत खात असेल तर सांगणार कोणाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या आणि पर्वती टेकडीच्या उतारावर असलेल्या जनता वसाहत, दत्तवाडी तसेच दांडेकर पुलाच्या भर रस्त्यावर गावठी दारूची राजरोस विक्री होत आहे. त्यात मांगीरबाबा चौकात एसबीआय बँकेच्या मागील ओढा, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील ट्रान्झिट कॅम्पचा परिसर, स्वामी विवेकानंद मठाच्या समोर, गोल्डन व्हील हॉटेलच्या मागील बाजूस, सिंहगड रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी ही दारूविक्री फुगे तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रामकृष्ण मठाच्या भिंतीसमोर ही दारूविक्री केली जाते, त्यापासून अवघ्या काही अंतरावर वाहतूक पोलिसांचा दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा ताफा असलेली एक व्हॅनही दिवसभर उभी असते. मात्र, या विक्रेत्यांना त्याचाही धाक उरला नसल्याने भरदिवसा फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच नारळामध्ये ही दारूविक्री केली जात आहे. मागील महिन्यात मालाड येथे विषारी गावठी दारू प्यायल्यानंतर शेकडो जणांचा बळी गेला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने बेकायदा गावठी दारूविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुळातच गावठी दारूची निर्मिती आणि विक्री ही बेकायदाच असल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाच्याही तक्रारीची अथवा आदेशाची गरज नाही. अशी विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी जनता वसाहत परिसरात अशा बेकायदा विक्रेत्यांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने या परिसरातील काही लोकप्रतिनिधी तसेच नागरिक दत्तवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी या नागरिकांकडून पोलिसांना गावठी दारूविक्रेत्यांची माहिती देण्यात आली. मात्र, गावठी दारूबाबत काही तक्रार असल्यास नावासह लेखी तक्रार द्या, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, असे पोलिसांनी या लोकप्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे नावासह अर्ज दिल्यास तक्रार कोणी केली, हे पोलिसांकडून संबंधित विक्रेत्यांना सांगितले गेल्यास जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने तक्रार न देताच नागरिकांना मागे फिरावे लागले. यापूर्वीही अशाच तक्रारी केल्यानंतर त्यांना या दारूविक्रेत्यांकडून धमक्या आल्याचे प्रकार घडले आहेत.