शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अर्ज द्या, मग दारूवर कारवाईचं बघू!

By admin | Updated: July 23, 2015 04:37 IST

मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक

पुणे : मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरू आहे. पुण्यातील जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात मात्र या गावठी दारूचा महापूर आला आहे. विशेष म्हणजे या दारू विक्रेत्यांविरोधात कोणी दत्तवाडी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, तर आधी नावासह लेखी तक्रार द्या; मग कारवाईचं बघू, अशी भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे शहरात गावठी दारूविक्रेत्यांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, कुंपणच शेत खात असेल तर सांगणार कोणाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या आणि पर्वती टेकडीच्या उतारावर असलेल्या जनता वसाहत, दत्तवाडी तसेच दांडेकर पुलाच्या भर रस्त्यावर गावठी दारूची राजरोस विक्री होत आहे. त्यात मांगीरबाबा चौकात एसबीआय बँकेच्या मागील ओढा, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील ट्रान्झिट कॅम्पचा परिसर, स्वामी विवेकानंद मठाच्या समोर, गोल्डन व्हील हॉटेलच्या मागील बाजूस, सिंहगड रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी ही दारूविक्री फुगे तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रामकृष्ण मठाच्या भिंतीसमोर ही दारूविक्री केली जाते, त्यापासून अवघ्या काही अंतरावर वाहतूक पोलिसांचा दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा ताफा असलेली एक व्हॅनही दिवसभर उभी असते. मात्र, या विक्रेत्यांना त्याचाही धाक उरला नसल्याने भरदिवसा फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच नारळामध्ये ही दारूविक्री केली जात आहे. मागील महिन्यात मालाड येथे विषारी गावठी दारू प्यायल्यानंतर शेकडो जणांचा बळी गेला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने बेकायदा गावठी दारूविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुळातच गावठी दारूची निर्मिती आणि विक्री ही बेकायदाच असल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाच्याही तक्रारीची अथवा आदेशाची गरज नाही. अशी विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी जनता वसाहत परिसरात अशा बेकायदा विक्रेत्यांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने या परिसरातील काही लोकप्रतिनिधी तसेच नागरिक दत्तवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी या नागरिकांकडून पोलिसांना गावठी दारूविक्रेत्यांची माहिती देण्यात आली. मात्र, गावठी दारूबाबत काही तक्रार असल्यास नावासह लेखी तक्रार द्या, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, असे पोलिसांनी या लोकप्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे नावासह अर्ज दिल्यास तक्रार कोणी केली, हे पोलिसांकडून संबंधित विक्रेत्यांना सांगितले गेल्यास जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने तक्रार न देताच नागरिकांना मागे फिरावे लागले. यापूर्वीही अशाच तक्रारी केल्यानंतर त्यांना या दारूविक्रेत्यांकडून धमक्या आल्याचे प्रकार घडले आहेत.