शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अर्ज द्या, मग दारूवर कारवाईचं बघू!

By admin | Updated: July 23, 2015 04:37 IST

मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक

पुणे : मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरू आहे. पुण्यातील जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात मात्र या गावठी दारूचा महापूर आला आहे. विशेष म्हणजे या दारू विक्रेत्यांविरोधात कोणी दत्तवाडी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, तर आधी नावासह लेखी तक्रार द्या; मग कारवाईचं बघू, अशी भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे शहरात गावठी दारूविक्रेत्यांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, कुंपणच शेत खात असेल तर सांगणार कोणाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या आणि पर्वती टेकडीच्या उतारावर असलेल्या जनता वसाहत, दत्तवाडी तसेच दांडेकर पुलाच्या भर रस्त्यावर गावठी दारूची राजरोस विक्री होत आहे. त्यात मांगीरबाबा चौकात एसबीआय बँकेच्या मागील ओढा, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील ट्रान्झिट कॅम्पचा परिसर, स्वामी विवेकानंद मठाच्या समोर, गोल्डन व्हील हॉटेलच्या मागील बाजूस, सिंहगड रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी ही दारूविक्री फुगे तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रामकृष्ण मठाच्या भिंतीसमोर ही दारूविक्री केली जाते, त्यापासून अवघ्या काही अंतरावर वाहतूक पोलिसांचा दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा ताफा असलेली एक व्हॅनही दिवसभर उभी असते. मात्र, या विक्रेत्यांना त्याचाही धाक उरला नसल्याने भरदिवसा फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच नारळामध्ये ही दारूविक्री केली जात आहे. मागील महिन्यात मालाड येथे विषारी गावठी दारू प्यायल्यानंतर शेकडो जणांचा बळी गेला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने बेकायदा गावठी दारूविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुळातच गावठी दारूची निर्मिती आणि विक्री ही बेकायदाच असल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाच्याही तक्रारीची अथवा आदेशाची गरज नाही. अशी विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी जनता वसाहत परिसरात अशा बेकायदा विक्रेत्यांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने या परिसरातील काही लोकप्रतिनिधी तसेच नागरिक दत्तवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी या नागरिकांकडून पोलिसांना गावठी दारूविक्रेत्यांची माहिती देण्यात आली. मात्र, गावठी दारूबाबत काही तक्रार असल्यास नावासह लेखी तक्रार द्या, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, असे पोलिसांनी या लोकप्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे नावासह अर्ज दिल्यास तक्रार कोणी केली, हे पोलिसांकडून संबंधित विक्रेत्यांना सांगितले गेल्यास जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने तक्रार न देताच नागरिकांना मागे फिरावे लागले. यापूर्वीही अशाच तक्रारी केल्यानंतर त्यांना या दारूविक्रेत्यांकडून धमक्या आल्याचे प्रकार घडले आहेत.