शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सरकारी योजनांच्या लाभासाठी ९ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज’ या राज्य सरकारच्या कल्पनेला राज्यातील ९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज’ या राज्य सरकारच्या कल्पनेला राज्यातील ९ लाख शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात यात आणखी भर पडणार आहे.

ट्रॅक्टर खरेदीच्या अनुदानापासून बियाणे, शेती अवजारे, ठिंबक किंवा तुषार सिंचनापर्यंतच्या अनेक सरकारी योजनांचा यात समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावे लागत होते. त्यात वेळ जात असे, अर्जाचा निकाल लवकर होत नसे व अर्जदारापर्यंत लाभही नीट पोहचत नसे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. त्यावर ९ लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे.

या अर्जांची छाननी सध्या कृषी विभाग करत आहे. ज्या योजनेत उपलब्धतेपेक्षा जास्त अर्जदार आहेत, त्यात सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे अशा योजनांची यादी तालुका स्तरावर तयार करण्याच्या सुचना देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावरील योजनांसाठीही याच पद्धतीने काम होणार आहे. अर्जाची छाननी, पात्र अर्जदारांची यादी, त्याची योजनानिहाय नोंद अशा बऱ्याच गोष्टी यात कराव्या लागणार असल्याने आयुक्त कार्यालयात सध्या याचीच गडबड सुरू आहे.

शेतकऱ्यांनी संकेतस्थळावरून अर्ज करायचा. त्यात आधार कार्ड, मोबाईल क्रमांक बँक खात्याबरोबर लिंक करून सोबत आवश्यक ती सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर कृषी विभाग अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांना योजनेत समावेश झाल्याचे कळवणार आहे. त्यानंतर त्याने स्वखर्चाने खरेदी करायची, त्याच्या पावत्या संकेतस्थळावर ‘स्कॅन’ करायच्या व त्यानंतर मंजूर अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे.