शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बाह्यवळण विरोधात उच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: April 24, 2016 04:20 IST

पुणे-नाशिक महामार्गाला राजगुरुनगर येथून काढण्यात येत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात बाधित गावांतील सात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च्य न्यायालयात जनहित याचिका दाखल

राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाला राजगुरुनगर येथून काढण्यात येत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात बाधित गावांतील सात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च्य न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती एक याचिकाकर्ते आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल ऊर्फ बाबा राक्षे यांनी दिली.या बाह्यवळणास प्रथम विरोध आणि नंतर काही अटींवर समझोता शेतकऱ्यांनी केला होता; पण समझोत्यात ठरल्याप्रमाणे शासन वागत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी हरकतींच्या सुनावन्यांवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळीच त्यांनी न्यायालयात जाण्याचे सूतोवाच केले होते. त्याप्रमाणे ते आता न्यायालयात गेले आहेत. सर्वश्री अनिल राक्षे, निवृत्ती होले, रवींद्र राक्षे, शिवाजी सांडभोर, दत्ता ढोरे, हरिभाऊ राक्षे, बबन सांडभोर या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२२) राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली ते पानमळा असा पाच किलोमीटर लांबीचा दोन टप्प्यातील बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. बाह्यवळण रस्त्यासाठी बागायती जमिनींचे संपादन होणार असल्यामुळे या रस्त्याला राक्षेवाडी, होलेवाडी, वरची भांबुरवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. या गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. परिणामी बाह्यवळण रस्त्यासाठी जमीन जाण्यामुळे अनेकजण भूमिहीन होत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या या रस्त्याला तीव्र विरोध होता. बाह्यवळण रस्त्याऐवजी राजगुरुनगर शहरातून उड्डाणपूल उभारावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु, उड्डाणपुलाऐवजी बाह्यवळण रस्त्यासाठी शासन आग्रही आहे. बाह्यवळण रस्ता मोजणी सुरू केल्यावर बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. मात्र, हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा व समझोता करून चांगला दर देण्याचे आश्वासन भूसंपादन महसूल अधिकाऱ्यांनी दिले होते. (वार्ताहर)चुकीच्या धोरणांमुळे उड्डाणपूल होईना‘अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे राजगुरुनगर शहरात उड्डाणपूल होत नाही. पुणे-नाशिक महामार्ग असलेला सध्याचा रस्ता रुंदीकरणासाठी योग्य असून, केवळ ७५० मीटर उड्डाणपुलाची गरज आहे. शिवाय, शहरातील सर्व जागा शासकीय आहेत. त्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्यास शासनाला कोणतीही अडचण येणार नाही. राजगुरुनगर शहरातील रस्ता यापूर्वीच रुंद करण्यात आला आहे अतिक्रमणे काढली आहेत. मात्र, राजकीय हितसंबंध असलेल्या नेत्यांच्या जमिनी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याच्या कडेला याव्यात या उद्देशाने प्रस्तावित बाह्यवळण इंग्रजीतील ह (डब्ल्यू) या आकाराचे बनविले आहे. या बाह्यवळण रस्त्याला सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.‘देशात अनेक ठिकाणी उड्डाणपूल असताना राजगुरुनगर येथेच उड्डाण पूल का नको? शासनाचा ५० टक्के खर्च वाचणार असताना बाह्यवळण कशासाठी हवे?’ असे सवालही राक्षे यांनी उपस्थित केले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळण रस्ता करण्यासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनर किंवा खरेदी-विक्रीच्या तुलनेत जो दर अधिक असेल त्याच्या तिप्पट मोबदला; तसेच झाडे, घरे, विहिरी यांचा मोबदला देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. संपादन होणाऱ्या जमिनींच्याबाबत शेतकऱ्यांनी आधी केलेल्या हरकतींवर २८ जानेवारी रोजी खेड तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बाह्यवळण रस्त्याला तीव्र विरोध नोंदवला व न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.