शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या ...

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी

येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या आणि सध्या पांढऱ्या गवताच्या आच्छादलेल्या या डोंगराची अवस्था अत्यंत भीषण झाली होती. वनअधिकारी यांनी कर्मचारी असे एकूण सुमारे २० जणंांनी दक्षता घेतल्याने सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ हेक्टर परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वणवा विझवल्यानंतर सर्व वनकर्मचारी घरी परतल्यानंतर रात्री पुन्हा वणवा पेटला व आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे ही आग आज दुपारी रामदरा परिसरातून आळंदी म्हातोबाची रामवाडी परिसरातील सोनोरी किल्ला परिसरात पोहोचली. वनखात्याच्या तोकड्या कर्मचारी यांनी सदर वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याचा वेग अधिक असल्याने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

सदर वणव्याने मध्यरात्रीनंतर रौद्ररूप धारण केल्याने वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला दाद मिळाली नाही. त्यातच वाऱ्याची साथ मिळाल्याने वणवा आणखी भडकला व त्याने आळंदी म्हातोबाचीकडे आगेकूच केली. त्यामुळे नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आता काळा राखेने माखला गेला. त्यामुळे सर्वत्र नजर पोहोचेल तेथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे.

वणवा लागल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय पुणेचे वनपाल, वनरक्षक वनकर्मचारी आदी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. ब्लोअर मशीन, पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीला वा-याची साथ मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यांमुळे या डोंगरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली. याचबरोबर या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्ष्यांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. आज दुपारी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ कर्मचारी आगीशी झुंज देताना दिसत होते. वरिष्ठ कार्यालयातील कोणीही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या वतीने झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु मोठी झाडे जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही ही शोकांतिका असल्याचे मत आळंदी म्हातोबाची परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.