शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या ...

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी

येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या आणि सध्या पांढऱ्या गवताच्या आच्छादलेल्या या डोंगराची अवस्था अत्यंत भीषण झाली होती. वनअधिकारी यांनी कर्मचारी असे एकूण सुमारे २० जणंांनी दक्षता घेतल्याने सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ हेक्टर परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वणवा विझवल्यानंतर सर्व वनकर्मचारी घरी परतल्यानंतर रात्री पुन्हा वणवा पेटला व आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे ही आग आज दुपारी रामदरा परिसरातून आळंदी म्हातोबाची रामवाडी परिसरातील सोनोरी किल्ला परिसरात पोहोचली. वनखात्याच्या तोकड्या कर्मचारी यांनी सदर वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याचा वेग अधिक असल्याने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

सदर वणव्याने मध्यरात्रीनंतर रौद्ररूप धारण केल्याने वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला दाद मिळाली नाही. त्यातच वाऱ्याची साथ मिळाल्याने वणवा आणखी भडकला व त्याने आळंदी म्हातोबाचीकडे आगेकूच केली. त्यामुळे नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आता काळा राखेने माखला गेला. त्यामुळे सर्वत्र नजर पोहोचेल तेथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे.

वणवा लागल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय पुणेचे वनपाल, वनरक्षक वनकर्मचारी आदी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. ब्लोअर मशीन, पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीला वा-याची साथ मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यांमुळे या डोंगरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली. याचबरोबर या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्ष्यांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. आज दुपारी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ कर्मचारी आगीशी झुंज देताना दिसत होते. वरिष्ठ कार्यालयातील कोणीही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या वतीने झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु मोठी झाडे जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही ही शोकांतिका असल्याचे मत आळंदी म्हातोबाची परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.