शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या ...

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी

येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या आणि सध्या पांढऱ्या गवताच्या आच्छादलेल्या या डोंगराची अवस्था अत्यंत भीषण झाली होती. वनअधिकारी यांनी कर्मचारी असे एकूण सुमारे २० जणंांनी दक्षता घेतल्याने सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ हेक्टर परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वणवा विझवल्यानंतर सर्व वनकर्मचारी घरी परतल्यानंतर रात्री पुन्हा वणवा पेटला व आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे ही आग आज दुपारी रामदरा परिसरातून आळंदी म्हातोबाची रामवाडी परिसरातील सोनोरी किल्ला परिसरात पोहोचली. वनखात्याच्या तोकड्या कर्मचारी यांनी सदर वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याचा वेग अधिक असल्याने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

सदर वणव्याने मध्यरात्रीनंतर रौद्ररूप धारण केल्याने वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला दाद मिळाली नाही. त्यातच वाऱ्याची साथ मिळाल्याने वणवा आणखी भडकला व त्याने आळंदी म्हातोबाचीकडे आगेकूच केली. त्यामुळे नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आता काळा राखेने माखला गेला. त्यामुळे सर्वत्र नजर पोहोचेल तेथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे.

वणवा लागल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय पुणेचे वनपाल, वनरक्षक वनकर्मचारी आदी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. ब्लोअर मशीन, पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीला वा-याची साथ मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यांमुळे या डोंगरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली. याचबरोबर या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्ष्यांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. आज दुपारी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ कर्मचारी आगीशी झुंज देताना दिसत होते. वरिष्ठ कार्यालयातील कोणीही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या वतीने झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु मोठी झाडे जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही ही शोकांतिका असल्याचे मत आळंदी म्हातोबाची परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.