शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जातीवाद हेच आरएसएस-भाजपाचे मूळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:13 IST

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे.

पुणे : जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ही नवी पेशवाई असून, त्याविरोधात सर्वांनी संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन एल्गार परिषदेत करण्यात आले.भीमा कोरेगाव येथील क्रांतीला २०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा दिन अभियानांतर्गत रविवारी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते चातुर्वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अब्दुल हमीद अजहरी, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते विनय रतन सिंग, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता प्रशांत दोंथा, छत्तीसगढमधील आदिवासी नेत्या सोनी सोरी, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन आदी या वेळी उपस्थित होते. शेकडो संघटनांनी एकत्रित येत या परिषदेचे आयोजन केले होते. शनिवारवाड्याच्या प्रांगणात झालेल्या या परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला.उमर खालीद म्हणाला, ‘‘पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. हिंदूराष्ट्र ही कल्पना लोकशाहीविरोधी आहे. तसे झाले तर ते देशासाठी दुर्दैवी असेल. जे वैचारिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्यांच्याकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये २०० वर्षांपूर्वी पेशवाई संपली. पण आजही मनुवाद व जातीवाद जिवंत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनाही यांनी देशद्रोही ठरवले असते. जातीवाद ही आरएसएसची ताकद असून, त्याला संपविण्याची गरज आहे. ’’संघ समाप्ती संमेलन घेऊयेत्या १४ एप्रिल रोजी मी अहमदाबादमध्ये नसेल तर नागपूरमध्ये येऊन संघ समाप्ती संमेलन घेऊ. लोकशाही संपवून संविधान बदलण्याची त्यांची इच्छा असल्याचे हेगडे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांचा हा डाव आधीपासूनच आहे. हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवाच, २०१९ मध्ये मोदींना घरी बसवून संविधान वाचवू, असेही जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले.कुठेही जा...नरेंद्र मोदी यांनी हिमालयात जावे, या जिग्नेश मेवाणी यांच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचा पुनरुच्चार मेवाणी यांनी केला. ते म्हणाले, त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता वैतागली आहे. केवळ जुमलेबाजी असते. त्यामुळे त्यांनी आता हिमालयात, नैनिताल कुठेही जावे. जागा त्यांनी निवडावी. तसेच निवडणुकीत त्यांनी ‘राम’ विरुद्ध ‘हज’ असे चित्र रंगविले होते. मोदींच्या डोक्यातील ही घाण संपविण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वच्छता अभियान राबवायला हवे, अशी खोचक टीका मेवाणी यांनी केली.राजकारण विसरूनएकत्र यादलित समाजातील अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत. हे पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी एकत्रित येत लढा उभारण्याची गरज आहे. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामातून प्रेरणा घेऊन भाजपा आणि आरएसएस या नव्या पेशवाईविरोधात उभे राहायला हवे. स्मृती इराणीसह इतरांनी मिळून रोहितची हत्या केली. रोहितचे जे झाले ते इतर तरुणांबाबत घडू नये. यासाठी मी घराबाहेर पडून ही लढाई सुरू केली आहे. - राधिका वेमुला‘आरएसएस’ला २०२२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या काळात ते सत्ता मिळवून संविधान बदलण्याचा प्रचार करत आहेत. तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणे अवघड झाले आहे. भीतीचे आणि दडपशाहीचे जे वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्याच्या विरोधात लढावे लागेल.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर