शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

रामदास आठवले : शिरूर पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन

शिरूर : राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती करण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही, असे येथे वक्तव्य करून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला सूचक इशारा दिला. राजकीय परिस्थितीवर आपल्या खास शैलीत चारोळ्या सादर करून धमाल उडवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आठवले आज शिरूरला आले होते.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार बाबूराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भारतीय पासपोर्ट अधिकारी एसएफएच रिजवी, पोस्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी ताकवले, भाजपाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अ‍ॅड. धर्मेंद्र खांडरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, महिला जिल्हा उपसंघटक विजया टेमगीरे, तालुका संघटक शैलजा दुर्गे, अनघा पाठक , रेश्मा शेख,पं.स.सदस्य डॉ बबन पोकळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष निलेश जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,नगरसेविका अंजली थोरात, पुजा जाधव, विनोद भालेराव,मंगेश खांडरे,माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर किरण देशमुख, गणेश जामदार आदि यावेळी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यांनी लोकसभेच्या जागेसंदर्भातही कोण किती जागा लढणार याबाबतही घोषणा केली. घटक पक्षांबाबत मात्र युतीने भुमिका स्पष्ट न केल्याने अस्वस्थ असलेल्या आठवले यांनी आज येथे भाजपा शिवसेनेची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.महाराष्टाच्या व देशाच्या भल्यासाठी भाजपा शिवसेना युती व्हावी.अशी भुमिका आपण सातत्याने मांडली. अखेर वाद मिटला. युती झाल्याचे आठवले म्हणाले. मात्र अचानक त्यांनी पवित्रा बदलत,कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत होतो, शरद पवार यांच्याशी आजही मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणात मार्ग वेगळे असलेतरी दोस्ती तोडायची नसते.असे सांगतानाच कधी कोणाबरोबर दोस्ती करण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही.असे वक्तव्य करून दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाला सुचक इशारा देण्याचा प्रयत्न केला.

इशारा दिला असला तरी आठवले यांनी नरेंद्र मोदी व सरकारचे भरभरून कौतुक केले. ह्यपासपोर्ट आॅफिस मुळे मला होत आहे हर्ष... कारण २०१९ हे आहे नरेंद्र मोदींचे वर्ष ह्य या चारोळ्यांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी हे सर्वात अ‍ॅक्टीव्ह पंतप्रधान असल्याचे सांगतानाच जनतेच्या शंभर टक्के अपेक्षा पुर्ण झाल्या नसल्यातरी सरकारने मोठ्या प्रमाणावर कामे केल्याचे आठवले म्हणाले.एकंदरीतच युतीकडून आठवलेंच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यास इशारा दिल्याप्रमाणे आठवले मित्र बदलतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले