शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अतीवृष्टीमुळे राज्याच्या काही भागाचे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम चांगला जाण्याची चिन्हे असताना ढगाळ हवामानाचे संकट आले आहे. राज्यातील ७२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांची उगवणही झाली आहे.

ढगाळ हवामान फार दिवस टिकले तर उगवून आलेल्या पिकांना किड-रोगांचा धोका असल्याचे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्याचे रब्बी क्षेत्र सरासरी ५१ लाख २० हजार हेक्टर आहे. यातील ३७ लाख २ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक २० लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारीचे असते. यंदा १३ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ८ लाख ७५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ८१ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. अनेक ठिकाणी अजून पेरणीपूर्व मशगातीची कामे सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडी गायब झाली आहे. हे हवामान नव्याने उगवून आलेल्या पिकांवरील किड-रोगांंसाठी पोषक असते. मका व ज्वारीच्या पिकावर आताच काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. तसेच हरभऱ्यात घाटे अळी आणि मर रोग आढळून आला आहे. हे हवामान फार काळ टिकणार नाही. उन्हाची सुरुवात झाल्यानंतर पिकांसाठी ते अनुकूल ठरेल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.