शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

डाळिंबांवर आणखी एक संकट

By admin | Updated: July 6, 2016 03:13 IST

पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बारामती : पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणीला लागणारा खर्चदेखील जास्तच आहे. सावतामाळीनगर (ता. इंदापूर) येथील डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. या संदर्भात येथील महिला शेतकरी केशरबाई शिंदे यांनी सांगितले, की साडेतीन एकरांत १२०० झाडांची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाचा बहर येण्यास सुरुवात झाली. परंतु, तेल्या रोगामुळे फळे फुटत आहेत. डाळिंबा बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेतले. लाखो रुपये खर्च केला. एका झाडाला १०० ते १२० फळे लागतात. तोडणीपर्यंत ७० ते ८० फळे हाती येतात, असे येथील शेतकऱ्याने सांगितले. तेल्या रोगामुळे खर्च वाया गेला. बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. केशरबाई शिंदे यांनी एकरी जिल्हा बँकेमार्फत पीकविमा उतरविला आहे. तसेच, दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. उत्पादन खर्च तरी यंदा निघणार का, अशी चिंता बागायतदारांना आहे. अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा लावण्यात आल्या आहेत. बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत. तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती आहे. पाण्यावर खर्च करताकरता रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी औषधांसाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न पडला आहे. काही शेतकऱ्यांनी बागाच नष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे. शेळगाव २५० ते ३०० हेक्टर, कडबनवाडी ५० हेक्टर क्षेत्रावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे येथील कृषी अधिकारी धेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)गेल्या वर्षीही नुकसानगेल्यावर्षीही तेल्या रोग डाळींबावर पडल्याने शेतकऱ्यांना बागा तोडून टाकल्या होत्या. यावर्षी तरी उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता.अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत.