शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

डाळिंबांवर आणखी एक संकट

By admin | Updated: July 6, 2016 03:13 IST

पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बारामती : पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणीला लागणारा खर्चदेखील जास्तच आहे. सावतामाळीनगर (ता. इंदापूर) येथील डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. या संदर्भात येथील महिला शेतकरी केशरबाई शिंदे यांनी सांगितले, की साडेतीन एकरांत १२०० झाडांची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाचा बहर येण्यास सुरुवात झाली. परंतु, तेल्या रोगामुळे फळे फुटत आहेत. डाळिंबा बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेतले. लाखो रुपये खर्च केला. एका झाडाला १०० ते १२० फळे लागतात. तोडणीपर्यंत ७० ते ८० फळे हाती येतात, असे येथील शेतकऱ्याने सांगितले. तेल्या रोगामुळे खर्च वाया गेला. बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. केशरबाई शिंदे यांनी एकरी जिल्हा बँकेमार्फत पीकविमा उतरविला आहे. तसेच, दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. उत्पादन खर्च तरी यंदा निघणार का, अशी चिंता बागायतदारांना आहे. अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा लावण्यात आल्या आहेत. बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत. तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती आहे. पाण्यावर खर्च करताकरता रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी औषधांसाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न पडला आहे. काही शेतकऱ्यांनी बागाच नष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे. शेळगाव २५० ते ३०० हेक्टर, कडबनवाडी ५० हेक्टर क्षेत्रावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे येथील कृषी अधिकारी धेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)गेल्या वर्षीही नुकसानगेल्यावर्षीही तेल्या रोग डाळींबावर पडल्याने शेतकऱ्यांना बागा तोडून टाकल्या होत्या. यावर्षी तरी उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता.अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत.