शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

डाळिंबांवर आणखी एक संकट

By admin | Updated: July 6, 2016 03:13 IST

पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बारामती : पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणीला लागणारा खर्चदेखील जास्तच आहे. सावतामाळीनगर (ता. इंदापूर) येथील डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. या संदर्भात येथील महिला शेतकरी केशरबाई शिंदे यांनी सांगितले, की साडेतीन एकरांत १२०० झाडांची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाचा बहर येण्यास सुरुवात झाली. परंतु, तेल्या रोगामुळे फळे फुटत आहेत. डाळिंबा बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेतले. लाखो रुपये खर्च केला. एका झाडाला १०० ते १२० फळे लागतात. तोडणीपर्यंत ७० ते ८० फळे हाती येतात, असे येथील शेतकऱ्याने सांगितले. तेल्या रोगामुळे खर्च वाया गेला. बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. केशरबाई शिंदे यांनी एकरी जिल्हा बँकेमार्फत पीकविमा उतरविला आहे. तसेच, दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. उत्पादन खर्च तरी यंदा निघणार का, अशी चिंता बागायतदारांना आहे. अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा लावण्यात आल्या आहेत. बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत. तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती आहे. पाण्यावर खर्च करताकरता रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी औषधांसाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न पडला आहे. काही शेतकऱ्यांनी बागाच नष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे. शेळगाव २५० ते ३०० हेक्टर, कडबनवाडी ५० हेक्टर क्षेत्रावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे येथील कृषी अधिकारी धेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)गेल्या वर्षीही नुकसानगेल्यावर्षीही तेल्या रोग डाळींबावर पडल्याने शेतकऱ्यांना बागा तोडून टाकल्या होत्या. यावर्षी तरी उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता.अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत.