शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

रवींद्र बऱ्हाटे टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पर्वती येथील एका जमीन प्रकरणात चत:श्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पर्वती येथील एका जमीन प्रकरणात चत:श्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

शैलेश जगताप, परवेज जमादार, जयेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे, प्रशांत जोशी, देवेंद्र जैन, प्रकाश फाले, संजय भोकरे (रा. सांगली), विशाल तोत्रे, प्रेमचंद बाफना, प्रशांत बाफना, विनय मुंदरा, हारिश बाफना, राज किरण बाफना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निलमणी देसाई (वय ६८, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे.

पर्वती येथील जमीन निलमणी देसाई यांच्या वडिलांनी त्यांचे जावई धैर्यशील देसाई यांच्या नावावर केली होती. त्यातील काही जागा विकसित केल्यानंतर देसाई यांच्याकडे ४ हजार ९१३ स्क्वेअर मीटर जागा राहिली होती. धैर्यशील देसाई यांच्या नावावरील जागा तुमच्या नावावर करुन देतो, असे कोथरुड येथील प्रशांत जोशी यांनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर प्रशांत जोशी याने त्यांच्याकडे शैलेश जगताप, जयेश जगताप व इतर ही जमीन विकत घेण्यास इच्छुक आहेत. तेच या जमिनीवर तुमच्या पतीच्या वारसांची नावे रवींद्र बऱ्हाटेकडून लावून देणार असल्याचे सांगितले. शैलेश जगतापने ऋषिकेश बारटक्केला जागा विका असे सांगितल्यावर त्यांच्याबरोबर ५ कोटी रुपयांचा जमिनीचा व्यवहार ठरला. बारटक्केने निलमणी देसाई व त्यांच्या मुलीच्या नावावर प्रत्येकी पाच लाख रुपये जमा केले. त्यानंतर देसाई यांच्या नावाने शैलेश जगताप व इतरांनी बारटक्केला धमकावून २० लाख रुपये घेतले.

जानेवारी २०१८ मध्ये बारटक्केने वारस म्हणून फिर्यादीचे नाव लावून घेतले. त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन सर्व आरोपी पैशाची मागणी करु लागले. संजय भोकरे, शैलेश जगताप, प्रशांत जोशी व इतरांनी खोट्या केसमध्ये अडकविण्याची व जीवे मारण्याची धमकी देत राहिले. भोकरेच्या कर्वे रोड येथील कार्यालयात बोलावून ४० लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर १० लाख रुपये रोख स्वरुपात घेतले, असे ऋषिकेश बारटक्केने फिर्यादीला सांगितले.

हा प्रकार प्रशांत जोशीला सांगितल्यावर तो एके दिवशी घरी आला व या विषयाची मूळ कागदपत्रे असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन गेला. शैलेश जगतापला फोन केल्यावर त्याने कागदपत्रे मिळणार नाहीत, ती जाळून टाकू, अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली. यापूर्वी चतु:श्रृंगी पोलिसांनी फिर्याद घेतली नव्हती. असे निलमणी देसाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.