शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या प्रवेशात पुन्हा गोंधळ होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. डिसेंबर २०१५ पासून आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत विविध तर्क लढविण्यात येत होते. ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र शासनाकडून शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई झाल्याने आता मार्चमध्ये प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील महिनाभराच्या काळात शाळा नोंदणी, पालकांनी करावयाचे अर्ज आणि सोडत पद्धतीने प्रवेश हे करावे लागणार आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळावर मात करण्यासाठी यंदा प्रथमच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक विभागात शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि गोंधळ न करता केली जावी व सर्व वॉर्ड पातळीवर सक्षम सहायक अधिकारी कक्ष नेमून पालकांना आॅनलाइन प्रक्रिया साह्य करावे. शाळांचे रजिस्ट्रेशन करून आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. (प्रतिनिधी)