शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: February 28, 2016 03:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या प्रवेशात पुन्हा गोंधळ होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. डिसेंबर २०१५ पासून आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत विविध तर्क लढविण्यात येत होते. ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र शासनाकडून शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई झाल्याने आता मार्चमध्ये प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील महिनाभराच्या काळात शाळा नोंदणी, पालकांनी करावयाचे अर्ज आणि सोडत पद्धतीने प्रवेश हे करावे लागणार आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळावर मात करण्यासाठी यंदा प्रथमच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक विभागात शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि गोंधळ न करता केली जावी व सर्व वॉर्ड पातळीवर सक्षम सहायक अधिकारी कक्ष नेमून पालकांना आॅनलाइन प्रक्रिया साह्य करावे. शाळांचे रजिस्ट्रेशन करून आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आवश्यक असणारी कागदपत्रे. रहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोनबिल, घर- पट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे), कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (मार्च २०१५ अखेरचे १ लाखापेक्षा कमी असलेले), जन्माचा दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक अधिसृूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य आहेत.