शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: February 28, 2016 03:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या प्रवेशात पुन्हा गोंधळ होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. डिसेंबर २०१५ पासून आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत विविध तर्क लढविण्यात येत होते. ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र शासनाकडून शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई झाल्याने आता मार्चमध्ये प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील महिनाभराच्या काळात शाळा नोंदणी, पालकांनी करावयाचे अर्ज आणि सोडत पद्धतीने प्रवेश हे करावे लागणार आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळावर मात करण्यासाठी यंदा प्रथमच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक विभागात शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि गोंधळ न करता केली जावी व सर्व वॉर्ड पातळीवर सक्षम सहायक अधिकारी कक्ष नेमून पालकांना आॅनलाइन प्रक्रिया साह्य करावे. शाळांचे रजिस्ट्रेशन करून आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आवश्यक असणारी कागदपत्रे. रहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोनबिल, घर- पट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे), कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (मार्च २०१५ अखेरचे १ लाखापेक्षा कमी असलेले), जन्माचा दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक अधिसृूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य आहेत.