शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

अंनिसचे ‘जबाब दो’ आंदोलन

By admin | Updated: June 21, 2017 06:19 IST

अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० जून रोजी ४६ महिने पूर्ण झाले आहेत तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० जून रोजी ४६ महिने पूर्ण झाले आहेत तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला जामीन देण्यात आला आहे. फरार आरोपींना पकडण्यात अपयश आल्यामुळेच आरोपी जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसकडून २० जुलै ते २० आॅगस्ट २०१७ दरम्यान ‘जबाब दो’ आंदोलन राज्यात राबविले जाणार असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.शासनाच्या दिरंगाईबद्दल महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेऊन जाब विचारणार आहेत. येत्या संसदेच्या व विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून त्याची चर्चा करावी, अशी मागणी या लोकप्रतिनिधींकडे अंनिसकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाला जनतेने याचा जाब विचारावा असे आवाहन अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार यांनी केले आहे. सारंग अकोलकर, विनय पवार तसेच त्याचे साथीदार प्रवीण लिमकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून मडगाव बॉम्बस्फोटानंतर गेल्या ८ वर्षांपासून फरार आहेत. या दोघांना पकडण्यामध्ये दिरंगाई झाल्यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे खून झाले. या फरार लोकांना वेळीच अटक झाली असती तर हे तिन्ही खून टाळता आले असते अशी भावना अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.