शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पशुखाद्याऐवजी जनावरांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:15 IST

दुधाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी निवडला नाइलाजाने पर्याय (रविकिरण सासवडे) खर्च परवडत नसल्याने निर्णय : पशुधनाच्या आयुष्यमानावर होतोय ...

दुधाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी

शेतकऱ्यांनी निवडला नाइलाजाने पर्याय

(रविकिरण सासवडे)

खर्च परवडत नसल्याने निर्णय : पशुधनाच्या आयुष्यमानावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा प्रतिलिटर भाव यामुळे दूधउत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पशुखाद्याचे दर परवडत नसल्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी आहारामध्ये जनावरांना अल्कोहोलचा चोथा (बार्ली) खाऊ घालत आहेत. परिणामी, दुधाळ जनावरांचे आयुष्यमान घटत असून बार्ली खाणाऱ्या जनावरांचे दूध देखील मानवी शरीरासाठी अपायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बारामती-इंदापूरच्या बागायतीसह जिरायती पट्ट्यामध्ये दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. सध्या ३.५ फॅट ८.५ एसएनएफ असणाऱ्या दुधाला २३ ते २४ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. तर, ५० किलो पशुखाद्याची एक पिशवी १ हजार ४०० रुपयांना मिळते. एक किलो पशुखाद्यासाठी २८ रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. ज्या डिसलेरी प्रकल्पामध्ये यामध्ये सडलेले गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाते. असे प्रकल्प वितरक नेमूण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बार्ली पाठवतात. ८ ते ९ रुपये किलो दराने मिळणारी बार्ली जनावरांना खाऊ घातली जाते.

१९ जुन २०१७ रोजी तत्कालीन भाजप सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर ठरविला होता. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन राज्य सरकाने २५ रुपये दूधदराचा अध्यादेश काढला. दरम्यान, निलंगेकर समितीच्या निर्देशाप्रमाणे २०१८-१९ मध्ये जिल्हा दूध व्यावसाय विकास कार्यालयाच्या वतीने दूध दराचे गणित मांडले होते. त्याप्रमाणे गाईच्या प्रतिलिटर दुधाला ४१.७७ पैसे उत्पादन खर्च तर म्हशीच्या प्रतिलिटर दुधाला ७४ रुपये ५५ पैसे उत्पादन खर्च होतो. भेसळयुक्त दूध बाजारात येत असल्याने गुणवत्तापूर्ण दुधाला दर मिळत नाही. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे दुग्धविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. तालुक्यातील दूधउत्पादकाला जर दुग्ध विकास राज्यमंत्री म्हणून भरणे न्याय देऊ शकत नसलतील, तर राज्यातील दूध उत्पादकला ते काय न्याय देणार, असा सवालही शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कोट

कमी दूध दरामुळे सध्या दुग्धव्यावसाय बार्लीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला जर उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला तर शेतकरी देखील जनावरांना अपायकारक ठरणारी बार्ली खाऊ घालणार नाही. शहरवासीयांनी देखील दुधाला योग्य दर दिला पाहिजे.

- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

-----------------------------

बार्ली जनावरांच्या खाण्यामध्ये १० टक्क्यांच्या पुढे गेल्यास जनावरांच्या यकृतावर परिणाम होतो. बुरशीयुक्त बार्ली खाऊन काही जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. बार्ली जनवारांसाठी अपायकारक आहे.

- शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

सध्या दूधव्यावसाय मोठ्या अडचणीत आहे. आम्ही कधीही जनावरांना बार्ली खाऊ घातली नाही. मात्र पशुखाद्य परवडत नसल्याने नाईलाजाने जनावरांना बार्ली खाऊ घालावी लागत आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता दुधाला ४० रूपये प्रतिलिटर दर हवा आहे. माझे रोजचे ६०० लिटर दूध उत्पादित होते. मात्र मजुरांचा खर्च, चारा, औषधोपचार, वीज, इंधन खर्च याचा विचार करता मला रोज ७ ते ८ हजार रुपयांचा तोटा होत आहे.

- नितीन माने, दूध व्यावसायिक,( कुरवली, ता. इंदापूर)