शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव थकीत बिलांमुळे वीजजोड तोडली; मुदतवाढ ...

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

थकीत बिलांमुळे वीजजोड तोडली; मुदतवाढ द्या, वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगवी : कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशानंतर सांगवी, शिरवली, खांडज, कांबळेश्वर येथील वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. संतप्त शेतकरी आणि महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे. परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहे. उसाची पिकेदेखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्याप्रकारे पाणीसाठा आहे. परंतु शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असूनही शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शनिवारी सांगवी येथील महावितरणचे कार्यालय गाठले. थेट अधिकाऱ्यांना घेराव घातला. सरकारने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होईपर्यंत किंवा सोयाबीनचे पीक निघेपर्यंत महावितरणने मुदत वाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदत वाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक संघर्ष झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढेदेखील विद्युत वीजजोड तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन, रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे, हनुमंत तावरे, दत्तात्रय तावरे, विरेंद्र तावरे, दत्तोबा ढाकाळकर, अरविंद तावरे,विठ्ठल फडतरे, विराज खलाटे, धनंजय खलाटे, इंद्रसेन आटोळे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी : सांगवीत संतप्त शेतकऱ्यांकडून महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.