शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

अंजिराचा ‘मिठा बहार’ जोरात

By admin | Updated: February 20, 2016 00:58 IST

पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी

नारायणपूर : पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यात हुशार आहेत. फळबागेच्याबाबतीत तेच आहे, कारण कोणत्या हंगामात काय पाहिजे, हे शेतकरी हेरून तसे उत्पादन घेत असतात. अंजिराचे दोन बहार असतात खट्टा बहार आणि मिठा बहार. सध्या चालू आहे मिठा बहार. कमी पाण्यावर याचे नियोजन करून हा बहार घेतला जातो. सोनोरी (ता. पुरंदर) येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त फळबागा आहेत. जास्तीत जास्त पाणी असेल तेच शेतकरी हा बहार घेतात. अंजिराचा गाव म्हणून सोनोरी गावाची ओळख आहे. प्रत्येक झाडाची उंची १० ते १५ फुटांपर्यंत आहे. पाण्याबरोबर खतांची मात्रा दिली जात असते. शेणखताच्या फक्त वापराने पिकावर चांगला परिणाम होत असतो. साधारण एका झाडावर सरासरी १५० किलो उत्पादन मिळते. साधारण दोन प्रतीत फळांची प्रतवारी करून पुण्याच्या बाजारपेठेत नेली जातात. किमान १० किलो वजनाची एक पाटी असते. आज एक नंबर मालाला १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. बाग चालू झाल्यावर मजुरीवरचा जास्त खर्च होत असतो. मागील वर्षी रोगामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी किमान १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सुनील शिंदे यांनी सांगितले.