शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अंजिराचा ‘मिठा बहार’ जोरात

By admin | Updated: February 20, 2016 00:58 IST

पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी

नारायणपूर : पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यात हुशार आहेत. फळबागेच्याबाबतीत तेच आहे, कारण कोणत्या हंगामात काय पाहिजे, हे शेतकरी हेरून तसे उत्पादन घेत असतात. अंजिराचे दोन बहार असतात खट्टा बहार आणि मिठा बहार. सध्या चालू आहे मिठा बहार. कमी पाण्यावर याचे नियोजन करून हा बहार घेतला जातो. सोनोरी (ता. पुरंदर) येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त फळबागा आहेत. जास्तीत जास्त पाणी असेल तेच शेतकरी हा बहार घेतात. अंजिराचा गाव म्हणून सोनोरी गावाची ओळख आहे. प्रत्येक झाडाची उंची १० ते १५ फुटांपर्यंत आहे. पाण्याबरोबर खतांची मात्रा दिली जात असते. शेणखताच्या फक्त वापराने पिकावर चांगला परिणाम होत असतो. साधारण एका झाडावर सरासरी १५० किलो उत्पादन मिळते. साधारण दोन प्रतीत फळांची प्रतवारी करून पुण्याच्या बाजारपेठेत नेली जातात. किमान १० किलो वजनाची एक पाटी असते. आज एक नंबर मालाला १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. बाग चालू झाल्यावर मजुरीवरचा जास्त खर्च होत असतो. मागील वर्षी रोगामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी किमान १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सुनील शिंदे यांनी सांगितले.