शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अंजिराचा ‘मिठा बहार’ जोरात

By admin | Updated: February 20, 2016 00:58 IST

पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी

नारायणपूर : पुरंदरचे अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुरंदर हा तालुका जरी दुष्काळी असला तरी पुरंदरमधील काही गावांमधून थोड्या पाण्याचे योग्य नियोजन करून कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यात हुशार आहेत. फळबागेच्याबाबतीत तेच आहे, कारण कोणत्या हंगामात काय पाहिजे, हे शेतकरी हेरून तसे उत्पादन घेत असतात. अंजिराचे दोन बहार असतात खट्टा बहार आणि मिठा बहार. सध्या चालू आहे मिठा बहार. कमी पाण्यावर याचे नियोजन करून हा बहार घेतला जातो. सोनोरी (ता. पुरंदर) येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त फळबागा आहेत. जास्तीत जास्त पाणी असेल तेच शेतकरी हा बहार घेतात. अंजिराचा गाव म्हणून सोनोरी गावाची ओळख आहे. प्रत्येक झाडाची उंची १० ते १५ फुटांपर्यंत आहे. पाण्याबरोबर खतांची मात्रा दिली जात असते. शेणखताच्या फक्त वापराने पिकावर चांगला परिणाम होत असतो. साधारण एका झाडावर सरासरी १५० किलो उत्पादन मिळते. साधारण दोन प्रतीत फळांची प्रतवारी करून पुण्याच्या बाजारपेठेत नेली जातात. किमान १० किलो वजनाची एक पाटी असते. आज एक नंबर मालाला १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. बाग चालू झाल्यावर मजुरीवरचा जास्त खर्च होत असतो. मागील वर्षी रोगामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी किमान १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सुनील शिंदे यांनी सांगितले.