शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

...अन् शेख हसिना यांना सोडवून आणता आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:05 IST

निवृत्त कर्नल अशोक तारा यांचा सैनिकी बाणा : १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धातील थरारक आठवणी

पुणे : सैनिकाचा पोशाख एकदा का अंगावर घातला की ऊन, वारा आणि पाऊस यांची पर्वा करायची नसते. अंगातील रगीच्या जोरावर अन मनातील आत्माविश्वासाच्या साथीने विजयश्री खेचून आणणे महत्त्वाचे. डिसेंबरच्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्टच वेगळी होती. यात भारताने पाकिस्तानला जेरीस आणून विजय संपादन केला खरा. त्यात पाकिस्तानने शेख मुजीबूर रहमानच्या कुटुंबीय आणि शेख हसिना यांना ओलीस ठेवले. पोटाला पिस्तूल लावलेले अन् आम्ही पूर्णपणे नि:शस्त्र असताना त्यांना सोडून आणता आले, याचे समाधान वाटते. या शब्दांत निवृत्त कर्नल अशोक तारा यांनी आपल्या युद्धप्रसंगातील विविध आठवणींना उजाळा दिला. यातील शेख हसिना म्हणजे सध्याच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या होय.

येत्या १६ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाला ४0 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पुण्यातील वॉर मेमोरियलला भेट दिली. त्या भेटीनंतर त्यांंनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधला. १९६३ मध्ये सैन्यात भरती झालेल्या कर्नल तारा यांना बांग्लादेशकडून ‘फ्रेंड्स आॅफ बांग्लादेश’ अशा पुरस्काराने सन्मानित केले. याचे कारण म्हणजे त्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने ओलीस ठेवलेल्या शेख मुजीबुउर रहमान यांच्या कुटुंबात आताच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश होता.

दस्तुरखुद्द हसीना यांनी भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही आठवण सांगताना कर्नल अशोक तारा यांचा उल्लेख ‘मेरे बडे भाई’ असा करून दिला. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धात राजस्थानातील बरमार भागात तारा यांची नेमणूक होती. यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ढाक्याची सीमा ओलांडली आणि आगारतळाच्या समोरील गंगासागर रेल्वे स्थानकाच्या भागात प्रवेश केला. या युद्धातील शौर्याकरिता सुभेदार अल्बर्ट एक्का यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले, तर मेजर तारा यांना वीरचक्राने गौरविण्यात आले.पाकिस्तानी सैनिकांशी संवाद तुटल्यानंतर १२ सैनिकांनी शेख कुटुंबीयांना ओलीस ठेवले होते. पुढे आलात तर गोळ्या घातल्या जातील, असे सांगण्यात आले. त्यांच्याशी हिंदी आणि पंजाबी भाषेत संवाद साधत होतो. मात्र त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. शेवटी बरीच विनवणी करून त्यांना मनवण्यात यश आले. थोड्या वेळानेच तिथे भारतीय हेलिकॉप्टर्स दाखल झाले. आणि शेख कुटुंबीयांची सुटका झाल्याची आठवण तारा यांनी या वेळी सांगितली....मोदी यांना सांगितली शौर्यगाथामागील वर्षीच्या एप्रिलमध्ये शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्या वेळी तारा हे आभा या आपल्या पत्नीसमवेत आले होते. त्या वेळी शेख यांनी पहिल्यांदा मोदी यांना कर्नल तारा यांच्या युद्धाच्या वेळच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगितली.