शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

...अन् शेख हसिना यांना सोडवून आणता आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:05 IST

निवृत्त कर्नल अशोक तारा यांचा सैनिकी बाणा : १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धातील थरारक आठवणी

पुणे : सैनिकाचा पोशाख एकदा का अंगावर घातला की ऊन, वारा आणि पाऊस यांची पर्वा करायची नसते. अंगातील रगीच्या जोरावर अन मनातील आत्माविश्वासाच्या साथीने विजयश्री खेचून आणणे महत्त्वाचे. डिसेंबरच्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्टच वेगळी होती. यात भारताने पाकिस्तानला जेरीस आणून विजय संपादन केला खरा. त्यात पाकिस्तानने शेख मुजीबूर रहमानच्या कुटुंबीय आणि शेख हसिना यांना ओलीस ठेवले. पोटाला पिस्तूल लावलेले अन् आम्ही पूर्णपणे नि:शस्त्र असताना त्यांना सोडून आणता आले, याचे समाधान वाटते. या शब्दांत निवृत्त कर्नल अशोक तारा यांनी आपल्या युद्धप्रसंगातील विविध आठवणींना उजाळा दिला. यातील शेख हसिना म्हणजे सध्याच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या होय.

येत्या १६ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाला ४0 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पुण्यातील वॉर मेमोरियलला भेट दिली. त्या भेटीनंतर त्यांंनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधला. १९६३ मध्ये सैन्यात भरती झालेल्या कर्नल तारा यांना बांग्लादेशकडून ‘फ्रेंड्स आॅफ बांग्लादेश’ अशा पुरस्काराने सन्मानित केले. याचे कारण म्हणजे त्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने ओलीस ठेवलेल्या शेख मुजीबुउर रहमान यांच्या कुटुंबात आताच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश होता.

दस्तुरखुद्द हसीना यांनी भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही आठवण सांगताना कर्नल अशोक तारा यांचा उल्लेख ‘मेरे बडे भाई’ असा करून दिला. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धात राजस्थानातील बरमार भागात तारा यांची नेमणूक होती. यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ढाक्याची सीमा ओलांडली आणि आगारतळाच्या समोरील गंगासागर रेल्वे स्थानकाच्या भागात प्रवेश केला. या युद्धातील शौर्याकरिता सुभेदार अल्बर्ट एक्का यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले, तर मेजर तारा यांना वीरचक्राने गौरविण्यात आले.पाकिस्तानी सैनिकांशी संवाद तुटल्यानंतर १२ सैनिकांनी शेख कुटुंबीयांना ओलीस ठेवले होते. पुढे आलात तर गोळ्या घातल्या जातील, असे सांगण्यात आले. त्यांच्याशी हिंदी आणि पंजाबी भाषेत संवाद साधत होतो. मात्र त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. शेवटी बरीच विनवणी करून त्यांना मनवण्यात यश आले. थोड्या वेळानेच तिथे भारतीय हेलिकॉप्टर्स दाखल झाले. आणि शेख कुटुंबीयांची सुटका झाल्याची आठवण तारा यांनी या वेळी सांगितली....मोदी यांना सांगितली शौर्यगाथामागील वर्षीच्या एप्रिलमध्ये शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्या वेळी तारा हे आभा या आपल्या पत्नीसमवेत आले होते. त्या वेळी शेख यांनी पहिल्यांदा मोदी यांना कर्नल तारा यांच्या युद्धाच्या वेळच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगितली.