शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

...आणि ‘ती’ बोहल्यावरून पळून गेली

By admin | Updated: November 18, 2016 05:54 IST

वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले.

मंचर (जि.पुणे) : वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले. लग्नाचे विधीही सुरू झाले. अखेर अल्पवयीन वधूने १०० नंबरवर संपर्क साधून हा प्रकार पोलिसांना कळविला. मात्र हे कळताच विधी उरकण्याची लगबग सुरू झाली. हार घालण्याची बळजबरी होताच ती बोहल्यावरून पळाली. ही घटना आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी मुलीचे आई, वडील, मध्यस्थ, मुलगा व त्याचे आई वडील अशा सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीने स्वत: फिर्याद दिली आहे. हातावर पोट असलेल्या तिच्या आई-वडिलांनी नागापूर येथील लक्ष्मण गायकवाड यांचा मुलगा पंकेश याच्याबरोबर तिचा विवाह निश्चित केला होता. दसऱ्याला टिळा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने कायद्यानुसार वय कमी असल्याने माझा विवाह करु नका, असे आई-वडिलांना समजावून सांगितले. परंतु, आपली परिस्थिती गरिबीची आहे. समोरील लोक सर्व खर्च करणार आहेत, तेव्हा तू गप्प राहा, अशी तिची समजूत घालण्यात आली. आज तिचा विवाह समारंभ होता. दुपारी लग्न होण्यापूर्वी तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून मंचर पोलीस ठाण्यात १०० क्रमांकावर संपर्क साधला आणि माहिती दिली. दरम्यान, पोलीस येत असल्याचे कळताच लग्नाचा विधी लवकर करण्याचे ठरले. मुलाच्या गळ्यात हार घाला,असे म्हणताच या बहाद्दर मुलीने पळ काढला. तिचे होणारे सासरे तिच्या मागे पळत आले. त्यांनी आम्ही खर्च केला आहे, तू लग्न कर, असे सुनावले. मात्र ती बधली नाही. (वार्ताहर)