शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

डाळिंब बागांवर फिरवला नांगर, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:35 IST

इंदापूर : आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकºयांना लखोपती केले. त्यांना चांगले दिवस आणले, त्याच डाळिंबाच्या बागा आता भाव नसल्याने शेतकºयांना कर्जबाजारी करू लागल्या आहेत.

इंदापूर : आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकºयांना लखोपती केले. त्यांना चांगले दिवस आणले, त्याच डाळिंबाच्या बागा आता भाव नसल्याने शेतकºयांना कर्जबाजारी करू लागल्या आहेत. त्यामुळे डाळिंबाचे आगार समजल्या जाणाºया इंदापूर तालुक्यात आता डाळिंबाच्या बागांच्या चिता पेटू लागल्या आहेत. शेकडो एकरांवर उभा असलेल्या डाळिंब बागांवर शेतकरी नांगर फिरवत असल्याचे चित्र आहे.नगदी व पैसे मिळवून देण्याची हमी असणारे पीक म्हणून ओळखले जात असलेल्या डाळिंबाच्या पिकाने गेल्या पाच वर्षांत उसाची जागा घेतली. सध्या तालुक्यात तेवीस हजार ते पंचवीस हजार एकरांवर डाळिंबाच्या क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकºयांपासून बड्या बागायतदार शेतकरी डाळिंब उत्पादक झाले आहे. इंदापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची मोठी बाजारपेठ आहे. रोख व्यवहार असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी फायद्यात होते. तालुक्यातील डाळिंबाची गोडी सातासमुद्रापार गेली होती. चीनच्या काही व्यापाºयांनी इंदापूरमधील डाळिंबाच्या बागेत येऊन डाळिंब खरेदी केली होती.या बागा जोपासताना आलेल्या अनेक संकटांना धीराने तोंड देत शेतकरी या संकटांना तोंड देत बागा जगवत होते. दुष्काळात पाणी कमी पडल्यावर टँकरने पाणी आणून बागा जगवल्या. भाव चांगला मिळत असल्याने खर्चाचा विचार न करता बागा जगविल्या जात होत्या.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून दरात सतत घसरण होत राहिली. डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. त्यातच तेल्या, मर अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. घटलेले उत्पादन, वाढलेला खर्च व अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल झाला. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना पंधरा ते वीस रुपये भाव मिळू लागला. झालेला खर्च ही निघेना. हतबल झालेल्या शेतकºयांनी बागा मोडल्या. त्यावर नांगर फिरविला. चार - चार वर्षे जपलेली झाडे मोडून काढली.तालुक्यातील गोतोंडी येथील महादेव शेंडे यांची पाच एकर डाळिंबाची बाग होती. ती जगविण्यासाठी त्याने पाच किलोमीटर अंतरावरुन जलवाहिनी आणली होती. पाच वर्षांपासून ते डाळींब पिकाचे उत्पादन घेत होते. सध्या भाव नसल्याने त्यांनी सर्व पाच ही एकर बाग नांगरून काढली आहे.कमी भाव व त्यात अनेक रोगांना बळी पडत असल्याने शेतकरी डाळिंबाच्या बागा मोडून त्या ठिकाणी दुसरे पीक घेत आहेत. तालुक्यातील तेवीस ते पंचवीस हजार एकरावर डाळिंबाचे क्षेत्र होते. मात्र, तीस टक्क्याहून अधिक बागा शेतकºयांनी मोडून टाकल्याचे कृषी अधिकारी शंकर शेंडे यांनी सांगितले.डाळिंबाच्या बागांना नेहमीच औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे या परिसरातील शेती औषध विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, सध्या यात घट झाली आहे. याचा मोठा फटका औषध विक्रेत्यांना बसला आहे, असे कृषी औषध विक्री केंद्र चालक मधुकर यादव यांनी सांगितले.निमगाव केतकी येथील पांडुरंग हेगडे यांनी सात एकरांवरची डाळिंबाची बाग नांगरली आहे. सध्याचा वाढलेला प्रचंड खर्च पाहता किलोला किमान ५० रुपये भाव मिळाला पाहिजे. परंतु, दर्जेदार डाळिंबाससुद्धा २० रुपयांच्या आत भाव मिळत आहे. २३ किलोंच्या क्रेटला २०० ते ३०० एवढा मातीमोल भाव मिळतो आहे. त्यामुळे खर्च हाताबाहेर गेल्याने त्यानी सात एकर बाग काढून टाकली आहे. वाळलेली झाडे जाळून टाकत आहोत, असे पाडुरंग हेगडे यांनी सांगितले.डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याच्या निर्यातीवर अनेक निर्बंध लावण्यात आले.त्यामुळे हा परिणाम होत आहे. सरकार ठिबकला अनुदान देते. बागांनाही अनुदान देते. मात्र तयार झालेल्या मालास योग्य भाव व त्याच्या मार्केटिंगकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकºयांवर ही वेळ आली आहे,असे जाणकारांचे मत आहे.