शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अमृतांजन पुलाला सुरक्षा जाळी

By admin | Updated: June 30, 2015 00:09 IST

सततच्या अपघाती घटनांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या ऐतिहासिक अमृतांजन पुलाला अखेर सोमवारी सुरक्षा जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले.

लोणावळा : सततच्या अपघाती घटनांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या ऐतिहासिक अमृतांजन पुलाला अखेर सोमवारी सुरक्षा जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे स्टंट करण्यावर चाप बसणार आहे़ वारंवार या ठिकाणी अपघात घडत होते़ मागील दोन वर्षांत चार अपघातांमध्ये चार युवक ठार, तर चार जण जायबंद झाले होते़ यासह किरकोळ घटना वारंवार या ठिकाणी घडत होत्या़ हा पूल अमृतांजन नव्हे, तर अपघाती पूल म्हणून प्रसिद्ध होत असल्याने या ठिकाणी रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ‘लोकमत’ने संबंधित यंत्रणांसह पोलीस प्रशासन व तहसीलदारांकडे लावून धरली होती़ याची दखल घेत मागील तीन दिवसांपासून कंपनीने या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले होते़ ते सोमवारी पूर्ण झाले़पुणे जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून या पुलाची ओळख आहे़ हा पूल केवळ यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा बनला होता़ द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीच्या काळात राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाला समांतर मोठा दुसरा पूल उभारण्यात आला होता़ मात्र, हे करत असताना दोन्ही पुलांच्या मध्ये साधारण चार ते पाच फु टांचे अंतर ठेवण्यात आले होते़ ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती़ (वार्ताहर)