शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम शासनाकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. मात्र, शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागांना निधीचे वाटप करूनही तब्बल १ कोटी ११ लाख ५ हजार रुपये निधी खर्चच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक अवयव व डोळा निकामी झाल्यास ३० हजार रुपये अनुदान दिले जाते.

राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभाचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. त्यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एकूण ६३५ विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ४ कोटी ६७ लाख २९ हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित केली गेली. त्यातील केवळ ३ कोटी ५६ लाख १६ हजार रुपये रक्कमच ४८३ अपघातग्रस्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचली. त्यामुळे १ कोटी ११ हजार ५ हजार रक्कम वितरित करूनही लाभार्थ्यांना मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

--------------