शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित गर्भपात कायद्याचा दुरुपयोग होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST

पुणे : गर्भपाताच्या सुधारित कायद्याचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सुधारित कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताची २० आठवड्यांची मर्यादा चार ...

पुणे : गर्भपाताच्या सुधारित कायद्याचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सुधारित कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताची २० आठवड्यांची मर्यादा चार आठवड्यांनी वाढवून २४ आठवडे करण्यात आली आहे. यासाठी सन १९७१ च्या गर्भपात कायद्याच्या कलम ३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींची संमती व नवी नियमावली तयार झाल्यानंतर सरकार हा सुधारित कायदा अधिसूचना काढून लागू करेल. सुधारित विधेयकामुळे गर्भातील व्यंग ओळखण्यास मदत होणार आहे. मात्र, कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

सध्या गर्भामध्ये व्यंग असणे किंवा बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असणे, अशा प्रकरणांमध्ये २० आठवड्यांहून अधिक वाढ झालेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी लागते. आता २४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा निर्णय डॉक्टरही स्वत:च्या पातळीवर घेऊ शकतील. २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात एका डॉक्टरच्या सल्ल्याने करता येईल तर २० ते २४ आठवडे या दरम्यानच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दर वर्षी सुमारे १७ लाख मुले व्यंगासह जन्माला येतात. गर्भपात कायद्यातील बदलाने हे प्रमाण कमी होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.

-----

गर्भपाताचा कालावधी २० वरून २४ आठवड्यांपर्यन्त वाढवावा, अशी डॉक्टरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कारण, बाळातील काही व्यंग, विशेषतः ह्रदयाशी संबंधित समस्या २२ ते २४ आठवड्यांमध्ये लक्षात येतात. अशा वेळी कायदेशीरदृष्ट्या सर्व प्रक्रिया अवघड होते. आता व्यंग ओळखून गर्भपाताचा सल्ला योग्य वेळी देता येईल. प्रत्येक गोष्टीत नाण्याला दोन बाजू असतात. सुधारित कायद्यामुळे काही लोक याचा दुरुपयोग करू शकतात. स्त्रीभ्रूणहत्या वाढण्याची भीतीही यात आहे. त्यामुळे समाजाने याबद्दल सद्सद्विवेकबुद्धीने विचार करण्याची गरज आहे.

- डॉ. माधुरी बुरांडे लाहा, स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल

-------

सुधारित गर्भपात कायदा सरसकट लागू होणे शक्य नाही. बलात्कारातून झालेली गर्भधारणा, घरातील व्यक्तीने केलेली बळजबरी, दिव्यांग गर्भवती आणि अल्पवयीन गर्भवती या चार प्रकारच्या घटनांमध्येच २४ आठवड्यानंतर गर्भपात करता येणार आहे. गर्भामध्ये व्यंग असेल तर उचच न्यायालयात अर्ज करावा लागतो. न्यायालय आपल्या जिल्ह्यातील समितीकडे अहवालाची चौकशी सोपवतो. अहवालाचा अभ्यास करून कारण योग्य वाटल्यासच न्यायाधीश गर्भपाताल परवानगी देतात. कायद्यानुसार सरसकट परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होऊ शकतो. २० आठवड्यांहून अधिक कालावधीचा गर्भ हा भारताचा नागरिक असतो. त्यामुळे त्याचा जीव घेण्याचा अधिकार सहजपणे देता येत नाही.

- डॉ. संतोष सिदिड, स्त्रीरोगतज्ज्ञ, नोबेल हॉस्पिटल