शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

सुधारित गर्भपात कायद्याचा दुरुपयोग होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST

पुणे : गर्भपाताच्या सुधारित कायद्याचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सुधारित कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताची २० आठवड्यांची मर्यादा चार ...

पुणे : गर्भपाताच्या सुधारित कायद्याचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सुधारित कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताची २० आठवड्यांची मर्यादा चार आठवड्यांनी वाढवून २४ आठवडे करण्यात आली आहे. यासाठी सन १९७१ च्या गर्भपात कायद्याच्या कलम ३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींची संमती व नवी नियमावली तयार झाल्यानंतर सरकार हा सुधारित कायदा अधिसूचना काढून लागू करेल. सुधारित विधेयकामुळे गर्भातील व्यंग ओळखण्यास मदत होणार आहे. मात्र, कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

सध्या गर्भामध्ये व्यंग असणे किंवा बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असणे, अशा प्रकरणांमध्ये २० आठवड्यांहून अधिक वाढ झालेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी लागते. आता २४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा निर्णय डॉक्टरही स्वत:च्या पातळीवर घेऊ शकतील. २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात एका डॉक्टरच्या सल्ल्याने करता येईल तर २० ते २४ आठवडे या दरम्यानच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दर वर्षी सुमारे १७ लाख मुले व्यंगासह जन्माला येतात. गर्भपात कायद्यातील बदलाने हे प्रमाण कमी होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.

-----

गर्भपाताचा कालावधी २० वरून २४ आठवड्यांपर्यन्त वाढवावा, अशी डॉक्टरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कारण, बाळातील काही व्यंग, विशेषतः ह्रदयाशी संबंधित समस्या २२ ते २४ आठवड्यांमध्ये लक्षात येतात. अशा वेळी कायदेशीरदृष्ट्या सर्व प्रक्रिया अवघड होते. आता व्यंग ओळखून गर्भपाताचा सल्ला योग्य वेळी देता येईल. प्रत्येक गोष्टीत नाण्याला दोन बाजू असतात. सुधारित कायद्यामुळे काही लोक याचा दुरुपयोग करू शकतात. स्त्रीभ्रूणहत्या वाढण्याची भीतीही यात आहे. त्यामुळे समाजाने याबद्दल सद्सद्विवेकबुद्धीने विचार करण्याची गरज आहे.

- डॉ. माधुरी बुरांडे लाहा, स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल

-------

सुधारित गर्भपात कायदा सरसकट लागू होणे शक्य नाही. बलात्कारातून झालेली गर्भधारणा, घरातील व्यक्तीने केलेली बळजबरी, दिव्यांग गर्भवती आणि अल्पवयीन गर्भवती या चार प्रकारच्या घटनांमध्येच २४ आठवड्यानंतर गर्भपात करता येणार आहे. गर्भामध्ये व्यंग असेल तर उचच न्यायालयात अर्ज करावा लागतो. न्यायालय आपल्या जिल्ह्यातील समितीकडे अहवालाची चौकशी सोपवतो. अहवालाचा अभ्यास करून कारण योग्य वाटल्यासच न्यायाधीश गर्भपाताल परवानगी देतात. कायद्यानुसार सरसकट परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होऊ शकतो. २० आठवड्यांहून अधिक कालावधीचा गर्भ हा भारताचा नागरिक असतो. त्यामुळे त्याचा जीव घेण्याचा अधिकार सहजपणे देता येत नाही.

- डॉ. संतोष सिदिड, स्त्रीरोगतज्ज्ञ, नोबेल हॉस्पिटल