शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

पर्यटनात्मक विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गतीची गरज

By admin | Updated: December 22, 2016 01:58 IST

थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या

लोणावळा : थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी विद्यमान नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. लोणावळा हे शहर मुंबई, पुणे व नाशिक या तीन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यावर वसलेले असून, येथे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, लोहमार्ग असे पर्याय उपलब्ध आहेत. काही तासांमध्ये या ठिकाणी सहजरीत्या येता येत असल्याने राज्यभरातील पर्यटक लोणावळ्याला पर्यटनासाठी पसंती देतात. असे असले, तरी येथील पर्यटनस्थळांचा योग्य प्रकारे विकास झालेला नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट ही ठिकाणे सोडली, तर इतर आठ महिने पाहण्यासारखे काहीच नाही. उन्हाळयातल तर पर्यटकांना लोणावळ्यात पाहण्याजोगे एकही ठिकाण नसल्याने केवळ थंड हवा एवढेच काय ते लोणावळ्याचे महत्त्व होऊन राहिले आहे. त्यातही जी काही पर्यटनस्थळे आहेत, ती शहराच्या बाहेर ग्रामीण भागात आहेत. तेथील ग्रामपंचायतींचे उत्पन्न अगदी अल्प असल्याने त्या पर्यटनस्थळांचा विकास करू शकत नाहीत. काही ठिकाणे ही वन विभागाच्या, तर काही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचा विकास रखडला आहे. केंद्र व राज्य सरकारनेही आत्तापर्यंत लोणावळ्याच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिक्की व हॉटेलवगळता आजतरी काहीच नसल्याने पर्यटकसंख्याही कमी होऊ लागली आहे. पर्यटन व्यवसाय वाढावा याकरिता मागील काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने हद्दीत रोपवे प्रकल्प, खंडाळा व वलवण तलावात नौकाविहार, तुंगार्ली तलाव परिसरात मनोरंजन नगरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित झाल्यास आमूलाग्र बदल होईल. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.आमदार बाळा भेगडे यांनी लोणावळा व परिसराचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी दिला आहे. यात शहरासह परिसरातील ग्रामीण भाग राजमाची किल्ला, कार्ला व भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पवना धरण, लायन्स पॉइंट या परिसरांचाही समावेश केला आहे. नगर परिषद सदस्य व आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यास पर्यटनामध्ये मोठी वाढ होईल. मुख्यमंत्र्यांनीदेखील विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदारांच्या माध्यमातून सदस्य व नगराध्यक्षांनी विकासासाठी केंद्र व राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात आणावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)