शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

वातावरण गरमागरम

By admin | Updated: July 24, 2015 04:35 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे सध्या बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदारकी, मिनी आमदारकीप्रमाणेच

बारामती : ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे सध्या बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदारकी, मिनी आमदारकीप्रमाणेच ग्रापंचायत निवडणुकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे. पक्ष एक असला, तरी गटातटाच्या राजकारणामुळे ही रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील जिरायती भागाची मागील चार वर्षांपासून दुष्काळाने पाठ सोडली नाही. मात्र, येथील ग्रामपंचायत निवडणुकांवर दुष्काळाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. बारामती तालुक्यातील प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटांमध्ये निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी चार-चार गट तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे हौशे-नवशे-गवशे आपले नशीब अजमावत आहेत. जिरायती भागात पावसाने ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. या भागाचे बरेचसे अर्थकारण खरिपावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भागात गंभीर आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही या भागात महत्त्वाचा आहे. येथील जनतेने मागील महिन्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही केली होती. मात्र, त्याकडे प्रशासन व गावकारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले. जिरायती भाग दुष्काळात होरपळत असताना ग्रामपंयाचत निवडणुकांमध्ये मात्र पाण्यासारखा पैसा वाहताना दिसत आहे. निवडणुका बिनविरोध करून खरे तर येथील दुष्काळी परिस्थितीवर उपायोजना करणे गरजेचे होते; मात्र तसे होताना दिसत नाही. गावातील पत, प्रतिष्ठा दाखविण्यासाठी निवडणुका हे चांगले माध्यम गावकारभाऱ्यांना मिळाले आहे. वाटेल तेवढा पैसा, जेवणावळी, दारू यांमुळे सांगकाम्या कार्यकर्त्यांमध्येही वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य मतदारही या निवडणुकांमध्ये मताला किती भाव फुटणार, याचीच वाट पाहत आहेत. याला अपवादही आहेत; मात्र तुरळकच. विकास आणि सोयीसुविधा यांवर फक्त प्रचार सभांमधूनच बोलले जाते. प्रत्यक्षात गावकीच्या राजकारणात जात, पै-पाहुणे आणि मत खरेदी या गोष्टींनाच जास्त महत्त्व आल्याचे दिसते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. त्यामध्ये स्थानिक मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्यात अनेकांना यश आले. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नीरावागज ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. तीन पॅनल एकमेकांसमोर उभे होते; परंतु स्थानिक पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी ५ जागा देऊन निवडणूक बिनविरोध केली. नवा आदर्श त्यामुळे निर्माण झाला आहे. तालुक्यात ४५८ सदस्यांची निवड होणार४७ पैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, तर दोन ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. एकूण १६५ प्रभागातून ४५८ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे. १,७०५ उमेदवारी अर्ज वैद्य ठरले होते. ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका टाळण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला. बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या नीरावागज गावाची ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. तर, खांडज गावाच्या प्रभाग ५ मधील दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला वर्गातून शारदा राजेंद्र ढवळे व मागासवर्गीयमधून बापट निवृत्ती कांबळे बिनविरोध झाले आहेत. कांबळे यांच्या विरोधातील सागर हनुमंत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, तर ढवळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. तर, सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष यांचा समावेश आहे. प्रभाग १ मधून उपदेश अशोक भोसले, प्रभाग ३ मधून मायादेवी मोहन देवकाते, विराज हनुमंत देवकाते, शोभा उत्तम माने या सोनेश्वर रयत सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. १३ पैकी ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.