शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण गरमागरम

By admin | Updated: July 24, 2015 04:35 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे सध्या बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदारकी, मिनी आमदारकीप्रमाणेच

बारामती : ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे सध्या बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदारकी, मिनी आमदारकीप्रमाणेच ग्रापंचायत निवडणुकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे. पक्ष एक असला, तरी गटातटाच्या राजकारणामुळे ही रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील जिरायती भागाची मागील चार वर्षांपासून दुष्काळाने पाठ सोडली नाही. मात्र, येथील ग्रामपंचायत निवडणुकांवर दुष्काळाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. बारामती तालुक्यातील प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटांमध्ये निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी चार-चार गट तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे हौशे-नवशे-गवशे आपले नशीब अजमावत आहेत. जिरायती भागात पावसाने ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. या भागाचे बरेचसे अर्थकारण खरिपावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भागात गंभीर आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही या भागात महत्त्वाचा आहे. येथील जनतेने मागील महिन्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही केली होती. मात्र, त्याकडे प्रशासन व गावकारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले. जिरायती भाग दुष्काळात होरपळत असताना ग्रामपंयाचत निवडणुकांमध्ये मात्र पाण्यासारखा पैसा वाहताना दिसत आहे. निवडणुका बिनविरोध करून खरे तर येथील दुष्काळी परिस्थितीवर उपायोजना करणे गरजेचे होते; मात्र तसे होताना दिसत नाही. गावातील पत, प्रतिष्ठा दाखविण्यासाठी निवडणुका हे चांगले माध्यम गावकारभाऱ्यांना मिळाले आहे. वाटेल तेवढा पैसा, जेवणावळी, दारू यांमुळे सांगकाम्या कार्यकर्त्यांमध्येही वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य मतदारही या निवडणुकांमध्ये मताला किती भाव फुटणार, याचीच वाट पाहत आहेत. याला अपवादही आहेत; मात्र तुरळकच. विकास आणि सोयीसुविधा यांवर फक्त प्रचार सभांमधूनच बोलले जाते. प्रत्यक्षात गावकीच्या राजकारणात जात, पै-पाहुणे आणि मत खरेदी या गोष्टींनाच जास्त महत्त्व आल्याचे दिसते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. त्यामध्ये स्थानिक मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्यात अनेकांना यश आले. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नीरावागज ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. तीन पॅनल एकमेकांसमोर उभे होते; परंतु स्थानिक पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी ५ जागा देऊन निवडणूक बिनविरोध केली. नवा आदर्श त्यामुळे निर्माण झाला आहे. तालुक्यात ४५८ सदस्यांची निवड होणार४७ पैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, तर दोन ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. एकूण १६५ प्रभागातून ४५८ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे. १,७०५ उमेदवारी अर्ज वैद्य ठरले होते. ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका टाळण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला. बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या नीरावागज गावाची ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. तर, खांडज गावाच्या प्रभाग ५ मधील दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला वर्गातून शारदा राजेंद्र ढवळे व मागासवर्गीयमधून बापट निवृत्ती कांबळे बिनविरोध झाले आहेत. कांबळे यांच्या विरोधातील सागर हनुमंत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, तर ढवळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. तर, सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष यांचा समावेश आहे. प्रभाग १ मधून उपदेश अशोक भोसले, प्रभाग ३ मधून मायादेवी मोहन देवकाते, विराज हनुमंत देवकाते, शोभा उत्तम माने या सोनेश्वर रयत सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. १३ पैकी ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.