शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

औंध-बाणेरच्या स्मार्ट खर्चामुळे प्रभागांमध्ये होणार असमतोल

By admin | Updated: December 4, 2015 02:46 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये केवळ मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेरवर खर्च होणार असल्याने प्रभागांमध्ये विकासाचा असमतोल निर्माण होणार आहे. यापूर्वी मोठी विकासकामे झालेल्या भागातच पुन्हा मोठा खर्च करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.केंद्र शासनाने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठविताना एका मॉडेल एरियाची निवड करून पाठविण्यास सांगितले होते. या मॉडेल एरियामध्ये झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असा सर्व प्रकारचा परिसर असला पाहिजे, असे बंधन ठेवण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने औंध-बाणेर परिसराची मॉडेल एरिया म्हणून निवड केली आहे.या भागामध्ये यापूर्वीच विकासकामांवर मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवक बाबूराव चांदेरे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या भागाच्या विकासकामांसाठी मोठा निधी मिळविला होता. या भागामध्ये प्रामुख्याने उच्चभ्रू सोसायट्यांचे प्रमाण मोठे आहे. प्रभागातील रस्ते प्रशस्त आहेत. घनकचरा व्यवस्थापन योग्य आहे. पाण्याचा पुरवठा मुबलक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी येत्या ५ वर्षांमध्ये साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यांपैकी १,३०० कोटी रुपये केवळ औंध-बाणेरच्या प्रभागामध्ये खर्च करण्यासाठी प्रस्तावित केले आहेत. औंध भगातून जाणाऱ्या नदीचा विकास केला जाईल, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलर एनर्जीचे प्रकल्प राबविण्यासाठी २८० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प या भागात राबविले जाणार असून, त्याकरिता ९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.औंध भागातील वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रभागात सायकल ट्रॅकची उभारणी केली जाणार आहे. रस्त्यांचे सुसूत्रीकरण, पदपथनिर्मिती करून वाहतूकव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. औंध परिसरामध्ये झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी दहा कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. झालेलीच कामे पुन्हा होण्याची भीतीस्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेले रस्ते पुन्हा चकाचक होतील, जुने पदपथ उखडून नवे बांधले जातील, रंगरंगोटीची कामे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. औंध-बाणेर भागाच्या निवडीला मुख्य सभेकडून मान्यता देताना नगरसेवकांनी अगोदरच विकसित असलेल्या औंध-बाणेरची निवड करण्याऐवजी पेठांच्या किंवा उपनगरातील अविकसित प्रभागाची निवड करण्याची जोरदार मागणी केली होती.महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना अविकसित भागांसाठी जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रभागातील असमतोल कमी करण्याचा त्यातून प्रयत्न केला जातो. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विशिष्ट प्रभागासाठी हजार कोटींचा निधी देऊन असमतोल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली जात आहे.