शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

औंध-बाणेरच्या स्मार्ट खर्चामुळे प्रभागांमध्ये होणार असमतोल

By admin | Updated: December 4, 2015 02:46 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यामध्ये बाराशे कोटी रुपये केवळ मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेरवर खर्च होणार असल्याने प्रभागांमध्ये विकासाचा असमतोल निर्माण होणार आहे. यापूर्वी मोठी विकासकामे झालेल्या भागातच पुन्हा मोठा खर्च करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.केंद्र शासनाने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठविताना एका मॉडेल एरियाची निवड करून पाठविण्यास सांगितले होते. या मॉडेल एरियामध्ये झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असा सर्व प्रकारचा परिसर असला पाहिजे, असे बंधन ठेवण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने औंध-बाणेर परिसराची मॉडेल एरिया म्हणून निवड केली आहे.या भागामध्ये यापूर्वीच विकासकामांवर मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवक बाबूराव चांदेरे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या भागाच्या विकासकामांसाठी मोठा निधी मिळविला होता. या भागामध्ये प्रामुख्याने उच्चभ्रू सोसायट्यांचे प्रमाण मोठे आहे. प्रभागातील रस्ते प्रशस्त आहेत. घनकचरा व्यवस्थापन योग्य आहे. पाण्याचा पुरवठा मुबलक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी येत्या ५ वर्षांमध्ये साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यांपैकी १,३०० कोटी रुपये केवळ औंध-बाणेरच्या प्रभागामध्ये खर्च करण्यासाठी प्रस्तावित केले आहेत. औंध भगातून जाणाऱ्या नदीचा विकास केला जाईल, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलर एनर्जीचे प्रकल्प राबविण्यासाठी २८० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प या भागात राबविले जाणार असून, त्याकरिता ९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.औंध भागातील वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रभागात सायकल ट्रॅकची उभारणी केली जाणार आहे. रस्त्यांचे सुसूत्रीकरण, पदपथनिर्मिती करून वाहतूकव्यवस्था गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. औंध परिसरामध्ये झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी दहा कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. झालेलीच कामे पुन्हा होण्याची भीतीस्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेले रस्ते पुन्हा चकाचक होतील, जुने पदपथ उखडून नवे बांधले जातील, रंगरंगोटीची कामे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. औंध-बाणेर भागाच्या निवडीला मुख्य सभेकडून मान्यता देताना नगरसेवकांनी अगोदरच विकसित असलेल्या औंध-बाणेरची निवड करण्याऐवजी पेठांच्या किंवा उपनगरातील अविकसित प्रभागाची निवड करण्याची जोरदार मागणी केली होती.महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना अविकसित भागांसाठी जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रभागातील असमतोल कमी करण्याचा त्यातून प्रयत्न केला जातो. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विशिष्ट प्रभागासाठी हजार कोटींचा निधी देऊन असमतोल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली जात आहे.