शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटले तरी पॉलिहाऊसची नुकसान भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:06 IST

टाकळी हाजी: गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस वाऱ्यांने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान ...

टाकळी हाजी: गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस वाऱ्यांने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्ष उलटले ,तरी सुद्धा अद्याप या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या खरिपात तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल तरुण शेतकरी वर्गातून केला जात आहे.

शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी असे आव्हान सरकार शेतकऱ्यांना करीत आहे .शेतीमधून कमी पाणी कमी क्षेत्र व कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शासन शेतकऱ्याला .मार्गदर्शन तसेच अनुदान देत असते .शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मात्र ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे तेथील शेतकऱ्यांनी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करीत ग्रीन व पॉलिहाऊस उभारणी केली आहे .त्यासाठी शासनाचे अनुदान व इतर पैसे हे बँकेचे कर्ज घेऊन पॉलिहाऊसचे काम करण्यात आलेले आहे.यामधून फुले व भाजीपाल्याचे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

गेल्यावर्षी जून मध्ये तालुक्यामधील सर्वच भागात वादळ वाऱ्या सह जोराचा पाऊस झाला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रींन हाऊस, पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने त्यांचे पंचनामे देखील केले. मात्र वर्षे झाली तरी अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशी खंत कान्हुर मेसाई येथील प्रगतशील शेतकरी सुधीर फक्कडराव पुंडे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकांचे कर्ज काढून पॉलिहाउस केले आहेत. मात्र अवकाळी पावसाने आधुनिक शेतीचे स्वप्न त्यांचे भंगले असून बँकांची कर्जाची थकबाकी वाढत चालली आहे.

शिरूर तालुक्यात शेकडो लोकांची वादळी वाऱ्याने झालेली नुकसान भरपाई एक वर्ष झाले तरी अद्याप मिळाली नसल्यामुळे या वर्षीचा खरीप हंगाम तरी शासन नुकसान भरपाई देऊन सुरु ह करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

०२ टाकळी हाजी

कान्हूरमेसाई येथील सुधीर पुंडे यांचे ग्रीन हाऊसचे झालेले नुकसान.