शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

वर्ष उलटले तरी पॉलिहाऊसची नुकसान भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:06 IST

टाकळी हाजी: गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस वाऱ्यांने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान ...

टाकळी हाजी: गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस वाऱ्यांने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्ष उलटले ,तरी सुद्धा अद्याप या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या खरिपात तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल तरुण शेतकरी वर्गातून केला जात आहे.

शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी असे आव्हान सरकार शेतकऱ्यांना करीत आहे .शेतीमधून कमी पाणी कमी क्षेत्र व कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शासन शेतकऱ्याला .मार्गदर्शन तसेच अनुदान देत असते .शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मात्र ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे तेथील शेतकऱ्यांनी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करीत ग्रीन व पॉलिहाऊस उभारणी केली आहे .त्यासाठी शासनाचे अनुदान व इतर पैसे हे बँकेचे कर्ज घेऊन पॉलिहाऊसचे काम करण्यात आलेले आहे.यामधून फुले व भाजीपाल्याचे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

गेल्यावर्षी जून मध्ये तालुक्यामधील सर्वच भागात वादळ वाऱ्या सह जोराचा पाऊस झाला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रींन हाऊस, पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने त्यांचे पंचनामे देखील केले. मात्र वर्षे झाली तरी अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशी खंत कान्हुर मेसाई येथील प्रगतशील शेतकरी सुधीर फक्कडराव पुंडे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकांचे कर्ज काढून पॉलिहाउस केले आहेत. मात्र अवकाळी पावसाने आधुनिक शेतीचे स्वप्न त्यांचे भंगले असून बँकांची कर्जाची थकबाकी वाढत चालली आहे.

शिरूर तालुक्यात शेकडो लोकांची वादळी वाऱ्याने झालेली नुकसान भरपाई एक वर्ष झाले तरी अद्याप मिळाली नसल्यामुळे या वर्षीचा खरीप हंगाम तरी शासन नुकसान भरपाई देऊन सुरु ह करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

०२ टाकळी हाजी

कान्हूरमेसाई येथील सुधीर पुंडे यांचे ग्रीन हाऊसचे झालेले नुकसान.