शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

राजगुरूनगर शहरातील वाहतूककोंडीला होणार पर्यायी मार्ग!

By admin | Updated: March 10, 2017 04:41 IST

अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे.

राजगुरुनगर : अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे. परंतु त्याचवेळी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवर अद्याप तोडगा न निघाल्याने ठप्प आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सध्यातरी अधांतरीच राहणार आहे.राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक व प्रवासी नेहमीच त्रस्त असतात. सुटीच्या दिवशी तसेच लग्नसराईच्या काळात तर कमीत कमी दोन ते तीन तास या भागात अडकून पडावे लागते. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना दोन-दोन किलोमीटर रांगा लागतात. अनेक व्हीआयपी लोकही या वाहतूककोंडीमध्ये अडकून पडतात. रुग्णवाहिकाही या कोंडीमध्ये अडकतात. या वाहतूककोंडीला केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि खेड ते सिन्नरदरम्यान सुरू असलेले पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत राजगुरुनगरच्या पूर्वेकडून होणारे बाह्यवळण हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी केदारेश्वर येथे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केंद्रिय रस्ते निधीतून पूल मंजूर केला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर पुण्याहून राजगुरुनगर शहरामध्ये येणारी वाहने व पश्चिमेकडे वाडा परिसरात जाणारी वाहने बसस्थानकाकडे न जाता बाहेरुनच जातील, त्यामुळे वाहतूककोंडीला खूपच फरक पडणार आहे. मात्र, त्याचवेळी भूसंपादन होऊनही बाह्यवळणाच्या कामाला मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही. पूर्वेकडून जाणाऱ्या या बाह्यवळणाला चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, ढोरे-भांबूरवाडी, राजगुरुनगर व सांडभोरवाडी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शासनाने अध्यादेश काढून या जमिनींचे संपादन केले आहे. तरीही नुकसान भरपाई शासकीय दरानुसार न मिळता बाजारभावानुसार मोबदला मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आळेफाटा ते सिन्नर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे आणि टोलवसुलीही सुरू केली आहे. (वार्ताहर) पोलीस स्थानक ते गढई मैदानपोलीस स्थानक ते गढई मैदान रस्त्याच्या सुशोभीकरणादरम्यान राजगुरुनगर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला आणखी एक पर्याय पोलीस स्थानक ते गढई मैदान या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची व ओढ्यावरील पुलाची खूपच दुर्दशा झाली होती. या रस्त्याने जाताना अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागते. हुतात्मा राजगुरुवाड्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या रस्त्याच्या कामासाठी ७९ लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून ४० लाख ७६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी भिंत बांधून हरित पट्टा, लॅण्डस्केपिंग व सुशोभीकरण केले जाणार आहे. तर रस्त्याचे काम स्थानिक निधीतून केले जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना तसेच हुतात्मा राजगुरुवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष बापू थिगळे व मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांनी सांगितले.