शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

राजगुरूनगर शहरातील वाहतूककोंडीला होणार पर्यायी मार्ग!

By admin | Updated: March 10, 2017 04:41 IST

अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे.

राजगुरुनगर : अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे. परंतु त्याचवेळी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवर अद्याप तोडगा न निघाल्याने ठप्प आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सध्यातरी अधांतरीच राहणार आहे.राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक व प्रवासी नेहमीच त्रस्त असतात. सुटीच्या दिवशी तसेच लग्नसराईच्या काळात तर कमीत कमी दोन ते तीन तास या भागात अडकून पडावे लागते. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना दोन-दोन किलोमीटर रांगा लागतात. अनेक व्हीआयपी लोकही या वाहतूककोंडीमध्ये अडकून पडतात. रुग्णवाहिकाही या कोंडीमध्ये अडकतात. या वाहतूककोंडीला केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि खेड ते सिन्नरदरम्यान सुरू असलेले पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत राजगुरुनगरच्या पूर्वेकडून होणारे बाह्यवळण हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी केदारेश्वर येथे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केंद्रिय रस्ते निधीतून पूल मंजूर केला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर पुण्याहून राजगुरुनगर शहरामध्ये येणारी वाहने व पश्चिमेकडे वाडा परिसरात जाणारी वाहने बसस्थानकाकडे न जाता बाहेरुनच जातील, त्यामुळे वाहतूककोंडीला खूपच फरक पडणार आहे. मात्र, त्याचवेळी भूसंपादन होऊनही बाह्यवळणाच्या कामाला मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही. पूर्वेकडून जाणाऱ्या या बाह्यवळणाला चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, ढोरे-भांबूरवाडी, राजगुरुनगर व सांडभोरवाडी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शासनाने अध्यादेश काढून या जमिनींचे संपादन केले आहे. तरीही नुकसान भरपाई शासकीय दरानुसार न मिळता बाजारभावानुसार मोबदला मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आळेफाटा ते सिन्नर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे आणि टोलवसुलीही सुरू केली आहे. (वार्ताहर) पोलीस स्थानक ते गढई मैदानपोलीस स्थानक ते गढई मैदान रस्त्याच्या सुशोभीकरणादरम्यान राजगुरुनगर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला आणखी एक पर्याय पोलीस स्थानक ते गढई मैदान या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची व ओढ्यावरील पुलाची खूपच दुर्दशा झाली होती. या रस्त्याने जाताना अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागते. हुतात्मा राजगुरुवाड्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या रस्त्याच्या कामासाठी ७९ लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून ४० लाख ७६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी भिंत बांधून हरित पट्टा, लॅण्डस्केपिंग व सुशोभीकरण केले जाणार आहे. तर रस्त्याचे काम स्थानिक निधीतून केले जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना तसेच हुतात्मा राजगुरुवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष बापू थिगळे व मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांनी सांगितले.