शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरक्षण सोडतीसोबतच फेररचनाही कळणार

By admin | Updated: October 5, 2016 01:45 IST

जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल

सुषमा नेहरकर-शिंदे , पुणेजिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल. त्यामुळे सोडतीसोबतच बुधवारीच (दि. ५) इच्छुकांना फेररचनादेखील कळणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये कोणाचे गट-गण जाणार व कोणाचे राजकीय भवितव्य टांगणीला लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत बुधवारी एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये काढण्यात येईल. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची आरक्षण सोडत दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. गटांचे आरक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार निवडणुका होत असल्याने गट-गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात गट-गणांची फेररचना नक्की कशी झाली, हे प्रथम कळणे अपेक्षित होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अगोदर आरक्षण सोडत अन् नंतर फेररचना जाहीर करण्यात येणार आहे.गट-गणांची आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार असून, त्यासाठी सन २००२, २००७ आणि २०१२चे आरक्षण गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे मागील ३ निवडणुकांत टाकण्यात आलेली आरक्षणे वगळून गट-गणांवर आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, या वेळी गट-गणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सन २०११च्या लोकसंख्येनुसार जुन्नर, भोर, दौंड आणि बारामती या तालुक्यांत प्रत्येकी एक गट कमी झाला आहे. तर, एकट्या हवेली तालुक्यात तब्बल तीन गटांची व शिरूर तालुक्यात एका गटाची नव्याने निर्मिती झाली आहे. नव्याने निर्माण झालेल्या गट-गणांमध्ये पूर्वीच्या गट-गणांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याने जुने आरक्षण गृहीत धरून चक्राकार आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, एखाद्या गट-गणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या नव्याने आली असल्यास येथे फ्रेश (प्रथमच) आरक्षण टाकण्यात येणार आहे. ही आरक्षणे जाहीर करीत असताना प्रत्येक गट-गणाची माहिती व नकाशा जाहीर करण्यात येईल.