शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीसोबतच कठोर नियंत्रण महत्त्वाचे

By admin | Updated: July 28, 2014 04:40 IST

पर्यावरणात होणाऱ्या घातक बदलांपासून भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच संशोधन, न्यायिक निर्णय आणि सरकारचे कठोर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे

पुणे : पर्यावरणात होणाऱ्या घातक बदलांपासून भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच संशोधन, न्यायिक निर्णय आणि सरकारचे कठोर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय पर्यावरण व माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले. रोटरी क्लब आॅफ पुणे हडपसर यांच्या वतीने ‘एन्व्हायरो व्हिजन’ या पर्यावरणविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी प्रांतपाल विवेक अऱ्हाना होते.जावडेकर म्हणाले, की पर्यावरणातील आणि वातावरणातील बदल हा विषय गंभीरपणे घेतला जात नाही. वातावरणातील कार्बनचे प्रदूषण वाढले असून, त्यामुळे समुद्राची पातळी गेल्या तीन-चार दशकांमध्ये ६ इंचांनी वाढली आहे. ती आगामी काळात वेगाने वाढतच जाणार आहे.पर्यावरण प्रकल्पांची अंमलबजावणी ढिसाळपणे होत असल्याबद्दल आणि प्रलंबित विषय मार्गी लागत नसल्याबद्दल खेद व्यक्त करून जावडेकर यांनी अशा प्रकल्पांमधील अनियमितता यापुढे सहन केली जाणार नाही. नागरिकांनी पर्यावरणरक्षणाच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना मोठी किंंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.घरगुती, औद्योगिक सांडपाणी आणि कृषी क्षेत्रातील त्याज्य पदार्थ मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये, जलस्रोतांमध्ये टाकले जातात. जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून ते रोखणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.विश्वंभर चौधरी यांनी पर्यावरण जपण्यासाठी शाश्वतता आणि सर्वसमावेशकता ही दोन तत्त्वे सांभाळली पाहिजेत, असे सांगितले. भरत शितोळे, हेमंत जगताप, एन. आर. करमळकर, संजय आठवले, महेंद्र घागरे, विनोद बोधनकर, जी. एन. कुलकर्णी, अनिल मेहेरकर यांनीही विचार मांडले. हडपसर क्लबचे अध्यक्ष अनिल शितोळे, पर्यावरण विभागप्रमुख मकरंद टिल्लू उपस्थित होते. (प्रतिनिधी)