शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जनजागृतीसोबतच कठोर नियंत्रण महत्त्वाचे

By admin | Updated: July 28, 2014 04:40 IST

पर्यावरणात होणाऱ्या घातक बदलांपासून भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच संशोधन, न्यायिक निर्णय आणि सरकारचे कठोर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे

पुणे : पर्यावरणात होणाऱ्या घातक बदलांपासून भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच संशोधन, न्यायिक निर्णय आणि सरकारचे कठोर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय पर्यावरण व माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले. रोटरी क्लब आॅफ पुणे हडपसर यांच्या वतीने ‘एन्व्हायरो व्हिजन’ या पर्यावरणविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी प्रांतपाल विवेक अऱ्हाना होते.जावडेकर म्हणाले, की पर्यावरणातील आणि वातावरणातील बदल हा विषय गंभीरपणे घेतला जात नाही. वातावरणातील कार्बनचे प्रदूषण वाढले असून, त्यामुळे समुद्राची पातळी गेल्या तीन-चार दशकांमध्ये ६ इंचांनी वाढली आहे. ती आगामी काळात वेगाने वाढतच जाणार आहे.पर्यावरण प्रकल्पांची अंमलबजावणी ढिसाळपणे होत असल्याबद्दल आणि प्रलंबित विषय मार्गी लागत नसल्याबद्दल खेद व्यक्त करून जावडेकर यांनी अशा प्रकल्पांमधील अनियमितता यापुढे सहन केली जाणार नाही. नागरिकांनी पर्यावरणरक्षणाच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना मोठी किंंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.घरगुती, औद्योगिक सांडपाणी आणि कृषी क्षेत्रातील त्याज्य पदार्थ मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये, जलस्रोतांमध्ये टाकले जातात. जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून ते रोखणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.विश्वंभर चौधरी यांनी पर्यावरण जपण्यासाठी शाश्वतता आणि सर्वसमावेशकता ही दोन तत्त्वे सांभाळली पाहिजेत, असे सांगितले. भरत शितोळे, हेमंत जगताप, एन. आर. करमळकर, संजय आठवले, महेंद्र घागरे, विनोद बोधनकर, जी. एन. कुलकर्णी, अनिल मेहेरकर यांनीही विचार मांडले. हडपसर क्लबचे अध्यक्ष अनिल शितोळे, पर्यावरण विभागप्रमुख मकरंद टिल्लू उपस्थित होते. (प्रतिनिधी)